शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:45 IST

दरम्यान, पालकांना त्यांच्या मुलांचा प्रवेश घेताना तीन वर्षे फीवाढ करणार नाही,

कल्याण : पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरातील नारायणा स्कूलमधील काही विद्यार्थ्यांनी शालेय फी न भरल्याने त्यांना वर्र्गाबाहेर बसविल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात पालकांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापनाने अचानक फीवाढ केली असून, ती अन्यायकारक आहे. वाढीव फी कमी करण्याची मागणी पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत शाळेच्या लायब्ररीत बसविले. याप्रकरणी आम्ही शाळेकडे जाब विचारला असता फी भरा मग बोलू, असा सल्ला आम्हाला देण्यात आला.

दरम्यान, पालकांना त्यांच्या मुलांचा प्रवेश घेताना तीन वर्षे फीवाढ करणार नाही, असे शाळेने सांगितले होते. फीवाढ करावीच लागल्यास पाच टक्के केली जाईल. आता अचानक ४० टक्के फीवाढ करण्यात आली आहे. पालकांनी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. त्यावर पत्रकारांनी शाळा व्यवस्थापनाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेने पत्रकारांना शाळेच्या आवारात येण्यास मज्जाव केला. तसेच मुख्याध्यापकांचा मोबाइल नंबर देण्यासही नकार दिला. त्यामुळे फीवाढीसंदर्भात शाळेची बाजू समजू शकलेली नाही.याप्रकरणी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी शाळेला समज दिली आहे. पालक व शाळा व्यवस्थापनाने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये, अशी सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण