शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाकडे फारसे कोणी वळत नाही

By admin | Updated: March 15, 2017 02:19 IST

संशोधन क्षेत्रात यश मिळवणे फार कठीण आहे. एखाद्या रोगावरील एक गोळी तयार करण्यासाठी १४-१५ वर्षे अहोरात्र काम करावे लागते.

डोंबिवली : संशोधन क्षेत्रात यश मिळवणे फार कठीण आहे. एखाद्या रोगावरील एक गोळी तयार करण्यासाठी १४-१५ वर्षे अहोरात्र काम करावे लागते. फार्मासिस्ट आपले काम करतो. त्यानंतर प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाते. औषधाच्या एका गोळीला पहिल्या टप्प्यातून जायलाच पहिल्या पाच वर्षांचा कालखंड जावा लागतो. काही संशोधक निवृत्त होतात. पण त्यांच्या नावावर एकही पेटंट असते नाही. त्यामुळेच या क्षेत्राकडे फारसे कोणी वळत नाही, अशी खंत संशोधक डॉ. कल्पना जोशी यांनी व्यक्त येथे केली.‘सुभेदारवाडा कट्ट्या’तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ड्रग डिस्कव्हरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व विविध असाध्य आजारांवरील औषधांचे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणाऱ्या कर्तृत्ववान महिला डॉ. कल्पना जोशी यांच्याशी शनिवारी संवाद साधण्यात आला. सुभेदारवाडा शाळेत झालेल्या या कार्यक्रमात अनुश्री फडणीस यांनी त्यांना बोलते केले.जोशी म्हणाल्या, की एखादे औषध कितीही परिणामकारक असले तरी त्याला पेटंट मिळवणे गरजेचे आहे. पेटंट नसेल तर त्या औषधाचा काहीही उपयोग होत नाही. आज ही मला खूप अभ्यास करावा लागतो. कॉन्फरन्सला जाणे किंवा जगात काय सुरू आहे, ते पाहावे लागते. उदा. एचआयव्ही या रोगावर काय काम सुरू आहे, याची माहिती ठेवावी लागते. बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटशन असतात. रिसर्च हे माझे पॅशन आहे. संशोधक झाले नसते तर शेफ झाले असते. सामान्य लोकांना कॅन्सरची खूप भिती वाटते. काही वेळा घाबरण्याची गरज नसते. काही वेळा पेशंट त्यातून बरा ही होतो. एखाद्या बरा होणारा नसला तरी तेथे जाऊन त्यांचे मनोधर्ये वाढवण्याचे काम मी करते. जे आयुष्य हातात आहे, ते त्यांना कसे चांगले प्रकारे जगता येईल, या विषयी मार्गदर्शन मी करते.२००५ मध्ये राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम माझ्या प्रयोगशाळेत आले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, स्वातंत्र्योत्तर काळात संशोधनात आपण म्हणावी, तशी प्रगती केलेली नाही. त्यामुळे संशोधनाची जगाला खूप गरज आहे. आपल्याला एखाद्या संशोधनाची कॉपी करायची असेल तरीही संशोधन करणे गरजेचे आहे. पालकांना केवळ मेडिकल आणि इंजिनियरिंग ही दोनच क्षेत्रे माहीत आहेत. पण त्यांनी आपल्या मुलांना संशोधन क्षेत्रात पाठवले पाहिजे. आपल्या मुलांमधील चमक ओळखा आणि त्याच क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, असा सल्ला देखील त्यांनी दिला. आपले संशोधन कोणत्या स्टेजला जाते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संशोधन ही देखील एक कला आहे. कोणत्याही कला म्हटली की त्यात ‘आयडिया’ ही ओघाने येते. कोणतेही संशोधन ‘आयडिया’शिवाय पुढे जाऊ शकत नाही. शास्त्रज्ञ हा नेहमी मन व बुध्दीपैकी केवळ बुध्दीचे ऐकत असतो. परदेशातील व आपल्याकडील जीवनपद्धतीत खूप फरक आहे. परदेशात खूप हळूवार व सावकाश काम केले जाते. आपल्याकडे प्रवासात अधिक वेळ जातो. तेथील महिला आरोग्याबाबत सर्तक आहेत. त्या वर्षातून एखादा आरोग्य तपासणी करतात. (प्रतिनिधी)