शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

संशोधनाकडे फारसे कोणी वळत नाही

By admin | Updated: March 15, 2017 02:19 IST

संशोधन क्षेत्रात यश मिळवणे फार कठीण आहे. एखाद्या रोगावरील एक गोळी तयार करण्यासाठी १४-१५ वर्षे अहोरात्र काम करावे लागते.

डोंबिवली : संशोधन क्षेत्रात यश मिळवणे फार कठीण आहे. एखाद्या रोगावरील एक गोळी तयार करण्यासाठी १४-१५ वर्षे अहोरात्र काम करावे लागते. फार्मासिस्ट आपले काम करतो. त्यानंतर प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाते. औषधाच्या एका गोळीला पहिल्या टप्प्यातून जायलाच पहिल्या पाच वर्षांचा कालखंड जावा लागतो. काही संशोधक निवृत्त होतात. पण त्यांच्या नावावर एकही पेटंट असते नाही. त्यामुळेच या क्षेत्राकडे फारसे कोणी वळत नाही, अशी खंत संशोधक डॉ. कल्पना जोशी यांनी व्यक्त येथे केली.‘सुभेदारवाडा कट्ट्या’तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ड्रग डिस्कव्हरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व विविध असाध्य आजारांवरील औषधांचे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणाऱ्या कर्तृत्ववान महिला डॉ. कल्पना जोशी यांच्याशी शनिवारी संवाद साधण्यात आला. सुभेदारवाडा शाळेत झालेल्या या कार्यक्रमात अनुश्री फडणीस यांनी त्यांना बोलते केले.जोशी म्हणाल्या, की एखादे औषध कितीही परिणामकारक असले तरी त्याला पेटंट मिळवणे गरजेचे आहे. पेटंट नसेल तर त्या औषधाचा काहीही उपयोग होत नाही. आज ही मला खूप अभ्यास करावा लागतो. कॉन्फरन्सला जाणे किंवा जगात काय सुरू आहे, ते पाहावे लागते. उदा. एचआयव्ही या रोगावर काय काम सुरू आहे, याची माहिती ठेवावी लागते. बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटशन असतात. रिसर्च हे माझे पॅशन आहे. संशोधक झाले नसते तर शेफ झाले असते. सामान्य लोकांना कॅन्सरची खूप भिती वाटते. काही वेळा घाबरण्याची गरज नसते. काही वेळा पेशंट त्यातून बरा ही होतो. एखाद्या बरा होणारा नसला तरी तेथे जाऊन त्यांचे मनोधर्ये वाढवण्याचे काम मी करते. जे आयुष्य हातात आहे, ते त्यांना कसे चांगले प्रकारे जगता येईल, या विषयी मार्गदर्शन मी करते.२००५ मध्ये राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम माझ्या प्रयोगशाळेत आले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, स्वातंत्र्योत्तर काळात संशोधनात आपण म्हणावी, तशी प्रगती केलेली नाही. त्यामुळे संशोधनाची जगाला खूप गरज आहे. आपल्याला एखाद्या संशोधनाची कॉपी करायची असेल तरीही संशोधन करणे गरजेचे आहे. पालकांना केवळ मेडिकल आणि इंजिनियरिंग ही दोनच क्षेत्रे माहीत आहेत. पण त्यांनी आपल्या मुलांना संशोधन क्षेत्रात पाठवले पाहिजे. आपल्या मुलांमधील चमक ओळखा आणि त्याच क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, असा सल्ला देखील त्यांनी दिला. आपले संशोधन कोणत्या स्टेजला जाते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संशोधन ही देखील एक कला आहे. कोणत्याही कला म्हटली की त्यात ‘आयडिया’ ही ओघाने येते. कोणतेही संशोधन ‘आयडिया’शिवाय पुढे जाऊ शकत नाही. शास्त्रज्ञ हा नेहमी मन व बुध्दीपैकी केवळ बुध्दीचे ऐकत असतो. परदेशातील व आपल्याकडील जीवनपद्धतीत खूप फरक आहे. परदेशात खूप हळूवार व सावकाश काम केले जाते. आपल्याकडे प्रवासात अधिक वेळ जातो. तेथील महिला आरोग्याबाबत सर्तक आहेत. त्या वर्षातून एखादा आरोग्य तपासणी करतात. (प्रतिनिधी)