शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाणीकपातीचे नो टेन्शन, पाऊस लांबल्यास टँकर द्या!- शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 07:20 IST

'लोकमत'च्या बातमीची पालकमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सध्या जिल्ह्यातील जलसाठ्यांत जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे  पाणीकपातीचे संकट नाही. पाऊस लांबल्यास पर्यायी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विषय ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.

जिल्ह्यातील जलसाठ्यांच्या स्थितीची माहिती देसाई यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. सर्व पलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही केल्या. तर वादळ, अतिवृष्टी, दरड कोसळल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करणे, या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिला बचत गट प्रक्रियेत न आलेल्या महिलांना प्रोत्साहित करणे, महिला  बचत गटाचे सहकार्य वाढवणे ते काम पालिका, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र करण्याचे नियोजन करावे, असेही देसाई यांनी सांगितले.

खर्चाचा नियमित आढावा घेणार

जिल्ह्यातील खर्चाचे नियोजन केले असून, वेळोवेळी कामांचा व खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनाचा खर्च १०० टक्के वेळेत कसा होईल, कामे वेळेत कशी सुरू होतील? वेळेत कशी पूर्ण होतील, दर्जेदार कशी होतील या सगळ्या गोष्टींकडे पालकमंत्री म्हणून माझे लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई