शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

पाऊस नाही; तरीही वाढीव कपात नाही

By admin | Updated: July 16, 2015 23:02 IST

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत

- सुरेश लोखंडे , ठाणेपावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी फेबु्रवारीपासूनच जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांमध्ये १४ टक्के पाणीकपात सुरू केली असता ती आजतागायत आहे. पावसाअभावी अद्याप या कपातीमध्ये जास्तीची वाढ होत नसल्यामुळे नागरिकांची या संकटातून काहीअंशी सुटका झाली आहे.प्रत्येक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत पाऊस येत असल्यामुळे या कालावधीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पण, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सध्या ते कोलमडले आहे. पण, उल्हास खोऱ्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे उल्हास नदीसह बारवी धरणाखालील नद्यानालेही दुथडी भरून वाहत असल्यामुळे ते पाणी आजपर्यंतही टिकून आहे. त्या पाण्याचा वापर करणाऱ्या ठामपाच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर या मनपांसह एमआयडीसी, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांसाठी होत आहे. सध्या या भागात जास्तीची कपात लागू करण्याची गरज नाही. पण, नागरिकांनी आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता ठेवण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असतानाही बारवी धरणात सुमारे १४ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनात आले होते. या सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी या धरणासह उल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण करण्यात आले होते. यामुळे सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत झाल्याने आजतागायत पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य झाले आहे. वाढत्या लोकसंख्येकडून पाण्याचा मनमानी वापर केला जात आहे. त्यास आळा घालण्याची आवश्यकता आहे.