शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पाऊस नाही; तरीही वाढीव कपात नाही

By admin | Updated: July 16, 2015 23:02 IST

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत

- सुरेश लोखंडे , ठाणेपावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी फेबु्रवारीपासूनच जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांमध्ये १४ टक्के पाणीकपात सुरू केली असता ती आजतागायत आहे. पावसाअभावी अद्याप या कपातीमध्ये जास्तीची वाढ होत नसल्यामुळे नागरिकांची या संकटातून काहीअंशी सुटका झाली आहे.प्रत्येक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत पाऊस येत असल्यामुळे या कालावधीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पण, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सध्या ते कोलमडले आहे. पण, उल्हास खोऱ्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे उल्हास नदीसह बारवी धरणाखालील नद्यानालेही दुथडी भरून वाहत असल्यामुळे ते पाणी आजपर्यंतही टिकून आहे. त्या पाण्याचा वापर करणाऱ्या ठामपाच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर या मनपांसह एमआयडीसी, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांसाठी होत आहे. सध्या या भागात जास्तीची कपात लागू करण्याची गरज नाही. पण, नागरिकांनी आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता ठेवण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असतानाही बारवी धरणात सुमारे १४ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनात आले होते. या सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी या धरणासह उल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण करण्यात आले होते. यामुळे सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत झाल्याने आजतागायत पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य झाले आहे. वाढत्या लोकसंख्येकडून पाण्याचा मनमानी वापर केला जात आहे. त्यास आळा घालण्याची आवश्यकता आहे.