शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नाही; तरीही वाढीव कपात नाही

By admin | Updated: July 16, 2015 23:02 IST

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत

- सुरेश लोखंडे , ठाणेपावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी फेबु्रवारीपासूनच जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांमध्ये १४ टक्के पाणीकपात सुरू केली असता ती आजतागायत आहे. पावसाअभावी अद्याप या कपातीमध्ये जास्तीची वाढ होत नसल्यामुळे नागरिकांची या संकटातून काहीअंशी सुटका झाली आहे.प्रत्येक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत पाऊस येत असल्यामुळे या कालावधीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पण, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सध्या ते कोलमडले आहे. पण, उल्हास खोऱ्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे उल्हास नदीसह बारवी धरणाखालील नद्यानालेही दुथडी भरून वाहत असल्यामुळे ते पाणी आजपर्यंतही टिकून आहे. त्या पाण्याचा वापर करणाऱ्या ठामपाच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर या मनपांसह एमआयडीसी, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांसाठी होत आहे. सध्या या भागात जास्तीची कपात लागू करण्याची गरज नाही. पण, नागरिकांनी आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता ठेवण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असतानाही बारवी धरणात सुमारे १४ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनात आले होते. या सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी या धरणासह उल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण करण्यात आले होते. यामुळे सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत झाल्याने आजतागायत पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य झाले आहे. वाढत्या लोकसंख्येकडून पाण्याचा मनमानी वापर केला जात आहे. त्यास आळा घालण्याची आवश्यकता आहे.