शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुणा न माहीत सजा किती ते...त्यांचे जग हेच बंदिशाला ठाणे मध्यवर्ती कारागृहातील १५० कैदी जामिनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : धनाजी जावळे (नाव बदलले आहे) याच्यावर त्याच्या मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला. मुलीचे एका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : धनाजी जावळे (नाव बदलले आहे) याच्यावर त्याच्या मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला. मुलीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्याला धनाजीने विरोध केल्याने त्या मुलाच्या मदतीने मुलीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्याने धनाजी उद्ध्वस्त झाला. आता त्याला कोर्टातून जामीन मंजूर होऊ शकतो. परंतु जामिनाची रक्कम भरण्याची ना त्याची ऐपत आहे, ना त्याच्या घरातील कुणी त्याला जामीन द्यायला तयार आहे. त्यामुळे धनाजी विनाकारण ठाणे कारागृहाच्या उंचच उंच भिंतीआड खितपत पडला आहे. इस्माईल अन्सारी (नाव बदलले आहे) हा छोट्या चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला. मात्र तो तुरुंगात असताना त्याच्या कुटुंबाची काय वाताहत झाली तेच त्याला ठाऊक नसल्याने त्याचा जामीन कोण देणार? हे व असे किमान १५० कैदी स्वातंत्र्याचे, मुक्त जीवनाचे स्वप्न उराशी बाळगून तुरुंगाच्या पोलादी भिंतीपलीकडे बंद आहेत.

सारा देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याकरिता सिद्ध होत असताना ठाणे तुरुंगातच नव्हे तर देशभरातील वेगवेगळ्या तुरुंगात असे कैदी खितपत पडलेले आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेले तीन हजार ४८० कैदी आहेत. यापैकी शिक्षा सुनावल्या गेलेल्या केवळ १४० कैद्यांचा समावेश आहे. याखेरीज गंभीर गुन्ह्यातील ७५ महिला व दोन हजार १९० पुरुष हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या कैद्यांपैकी किमान १५० कैदी असे आहेत की, ज्यांना जामीन मिळणे शक्य आहे. त्यामध्ये चोरी, घरफोडी, विनयभंग, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या तुलनेने किरकोळ गुन्ह्यांपासून बलात्कार व पोक्सो कायद्याखाली अटकेत असलेल्या कैद्यांचा समावेश आहे. या दीडेकशे कैद्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. शिवाय काहींशी नातलग, मित्रांनी संबंध पूर्णपणे तोडले आहेत. त्यामुळे काहींनी जामिनाकरिता अर्ज केलेले नाहीत किंवा काहींनी अर्ज केले तरी वकिलाची फी, जामिनाची रक्कम याची तजवीज करू शकलेले नाहीत. त्यापैकी काही कैदी पाच वर्षांपासून अधिक काळ तुुरुंगात खितपत पडले आहेत. काहींना तुरुंग हेच घर वाटू लागले आहे. येथे निदान दोन वेळच्या हक्काच्या जेवणाची सोय आहे. बाहेर गेलो तर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कुणी काम देणार नाही. नातलग घरात घेणार नाहीत. त्यामुळे बाहेर भुकेकंगाल मरण्यापेक्षा जेलमध्ये आयुष्य काढणे हाच मार्ग बरा आहे, असे एक कैदी सांगतो. मात्र अन्य एकाला बाहेरच्या खुल्या हवेची, स्वच्छंद पक्ष्यांना भरारी घेताना पाहण्याची, वाहत्या पाण्यात सूर मारण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु गुन्हेगारीचा शिक्का लागल्याने तो एकाकी पडलाय. त्याच्याकडे जामिनाकरिता पैसा नाही. जेल हे काही घर नाही. तुरुंग हा स्वातंत्र्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. अनेकांना यातून बाहेर पडायचे आहे, असे तो म्हणाला.

तुरुंग प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा गरीब व जामिनास पात्र कैद्यांच्या सुटकेकरिता सामाजिक संस्थांनी पुढे यायला हवे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्यालाच ते भाग्य लाभते. बाकी जेल हेच जीवन मानतात.

...........

वाचली