शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वाडा शहरात दुचाकी-चारचाकींना नाही अधिकृत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:29 IST

मुख्य रस्त्यांवरील पदपथांवर वाहनांचे अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथावर वाहने उभी करण्याची वेळ आली आहे. त्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

वाडा शहराची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तालुक्यातील विविध खेडेगावांतून मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहनधारक येत असतात. हे वाहनचालक वाहनतळाअभावी रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून बाजारात खरेदीसाठी जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. खंडेश्वरी नाका ते परळी नाका या ७०० मीटर अंतरावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. या वाहतूककोंडीचा त्रास या मार्गावरील पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना होत आहे. वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून नाशिककडे जाणाऱ्या वाडा - देवगांव रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवर बाजारात सामान खरेदीसाठी येणारे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारक आपली वाहने पदपथावरच उभी करीत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. शहरात नगर पंचायतीच्या मालकीच्या काही जागा आहेत.  या जागा ताब्यात घेऊन नगर पंचायतीने ‘पे अँड पार्कʼ या धर्तीवर वाहनतळ सुरू करावे, अशी मागणी नगर पंचायतीचे विरोधी पक्षनेते मनीष देहरकर यांनी केली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पदपथावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. नगर पंचायतीने कायद्याचा बडगा दाखवावा.- कुणाल साळवी, ग्रामस्थ, वाडा

टॅग्स :thaneठाणे