शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक; उल्हासनगरातील फटाके दुकानांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 17:25 IST

वर्षाला ४ कोटीचे उत्पन्न अपेक्षित

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील रुग्णालय, हॉटेल, लॉजिग-बोर्डिंग, शाळा, महाविद्यालय, दुकाने आदी ८० हजारा पेक्षा जास्त आस्थापनाना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे महापालिकेने बंधनकारक केले. शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत फटाके दुकानांना नोटिसा देऊन त्यांच्याकडून ५० हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

 उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून अरुंद रस्त्यामुळे आपत्कालीन वेळी अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून सेवा देतात. शासन नियमानुसार रुग्णालय, शाळा-महाविद्यालय, विविध दुकाने, हॉटेल, लॉजिग, कारखाने आदींना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. महापालिकेने सन-२०१३ मध्ये तसा ठराव मंजूर केला. मात्र रुग्णालयसह अन्य आस्थापना व्यतिरिक्त अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेत नोव्हते. अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या माहितीनुसार फक्त वर्षाला ३५० आस्थापना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेत आहेत. शहरात अश्या ७० ते ८० हजार आस्थापना असून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. 

महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी अग्निशमन दल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे अत्यावश्यक आस्थापनाना बंधनकारक असताना, असे प्रमाणपत्र का घेत नाही. अशी विचारणा अग्निशमन विभागाला करून, महापालिकेचा कोट्यवधींचे उत्पन्न बुडीत निघत असल्याची माहिती दिली. शुक्रवारी उपायुक्त अशोक नाईकवाडे हे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्या सोबत मार्केट मध्ये जाऊन फटाके दुकाने, हार्डवेअर दुकानांवर अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र का घेत नाही. अशी विचारणा करून केवळ ७ दुकानदाराना ५० हजाराचा दंड ठोटावला. तसेच फटाके दुकानदारांनी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. म्हणून त्यांना नोटिसा पाठविल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. 

ना हरकत प्रमाणपत्रासाठी वर्षाला ५०० रुपये- 

शहरातील रुग्णालय, हॉटेल, लोजिंग, कपड्याचे दुकाने, कारखाने आदी ७० ते ८० हजार आस्थापनाना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. सुरवातीला १ हजार रुपये प्रमाणपत्रासाठी खर्च येणार असून दरवर्षी प्रमाणपत्र नूतनिकरणासाठी ५०० रुपये खर्च येणार असून महापालिकेला यापासून वर्षाला ४ कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

टॅग्स :fireआगulhasnagarउल्हासनगर