शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

निधी नाही; तरीही नगर पालिकेची कोटींची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 23:25 IST

अंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा वादात अडकली आहे. आर्थिक तरतुदीपेक्षा चारपट जास्त विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे

पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा वादात अडकली आहे. आर्थिक तरतुदीपेक्षा चारपट जास्त विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे. मंजुरी दिलेल्या विकास कामांच्या खर्चाचा आकडा हा २५० कोटींच्या घरात असून तिजोरीत अवघे ६० कोटीच शिल्लक असल्याने ही सर्व कामे रखडणार आहेत. अंबरनाथ पालिकेच्या अर्थसंकल्पाला बगल देऊन कोटी -कोटींची कामे मंजूर करुन घेऊन शहरात विकास कामे करण्याचे स्वप्न अंबरनाथ पालिकेतील सत्ताधारी पाहत आहेत. पहिल्याच सर्वसाधारण सभेत २५० कोटीपेक्षाही जास्तीच्या विकास कामांना मंजुरी दिली. मात्र ती देतांना पालिकेची आर्थिक स्थिती पाहण्यात आलेली नाही. या मंजूर विकास कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर खरे सत्य अंबरनाथकरांपुढे आले. मंजूर कामांसाठी किती आर्थिक तरतूद शिल्लक आहे याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी मागितल्यावर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडली आहे. जो पर्यंत मंजूर विकास कामांचा अर्थसंकल्पीय तरतुदीसोबत ताळमेळ बसत नाही तोपर्यंत ती स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विकासकामांसाठी प्रतीक्षा : अशा परिस्थितीत मंजूर कामांपैकी कोणती कामे अर्थसंकल्पीय तरतुदीत बसवायची याची चाचपणी मुख्याधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. अर्थसंकल्पातील मंजूर निधीप्रमाणे विकास कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यावरच शहरात कामे करता येणार आहेत. सर्वसाधारण सभेत २५० कोटींची कामे मंजूर आहेत. मात्र पालिकेकडे अवघे ६० कोटीच शिल्लक आहे. त्यामुळे १९० कोटींच्या विकास कामांसाठी नगरसेवकांना आणि अंबरनाथकरांना प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. २५० कोटींची विकास कामे मंजूर करतांना आर्थिक तरतूद होईल त्या प्रमाणे कामे करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने सभागृहात दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यावर याच प्रशासनाने लेखी पत्र देऊन या कामांसाठी केवळ ६० कोटींची तरतूद असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नगरसेवकांची आणि सभागृहाची दिशाभूल केली आहे.