शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

थर्मल स्कॅनिंगशिवाय लॉजमध्ये प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:10 IST

कल्याण स्टेशन ते शीळफाट्यापर्यंत किमान २५ लॉज आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : लॉकडाऊन जाहीर होताच गेस्ट हाउस, लॉजिंग-बोर्डिंग ही सेवा अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने त्यांच्यावर प्रथम गदा आली. या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही चुकीचा आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. आता हॉटेल, लॉज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याकरिता अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे.

कल्याण स्टेशन ते शीळफाट्यापर्यंत किमान २५ लॉज आहेत. कल्याण-काटई ते अंबरनाथ रोडला २० लॉज आहेत. कल्याण ते टिटवाळादरम्यान व टिटवाळा शहरात २५ पेक्षा जास्त लॉज आहेत. कल्याण स्टेशन परिसरात १० पेक्षा जास्त गेस्ट हाउस व लॉज आहेत. डोंबिवली शहर ते मानपाडा रोड आणि औद्योगिक वसाहतीतही १० पेक्षा जास्त लॉज आहेत. या ठिकाणी मोठे पर्यटनस्थळ नसताना लॉजिंग-बोर्डिंगची संख्या लक्षणीय आहे. आयुक्तांनी ४६ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम ठेवत अन्य ठिकाणची बंदी उठविली आहे.

हॉटेल, गेस्ट हाउस सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी काहींनी अजून सुरू केलेली नाही. एका गेस्ट हाउसचालकाने सांगितले की, प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. रूममध्ये सॅनिटायझर ठेवले आहे. ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगची सक्ती केली आहे. एका खोलीत एकाच ग्राहकाला प्रवेश दिला जातो. आमच्याकडे १२ तासांचे ५०० रुपये एका रूमचे भाडे आहे. त्यामुळे अतिउच्च दर्जाच्या सुविधा पुरविल्या जात नाही. मात्र, रूम बरेच दिवस बंद होत्या. त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. आंतरराज्य बस वाहतूकसेवा सुरू आहे. प्रवासीसंख्या जास्त असली, तरी गेस्ट हाउसमध्ये जास्त ग्राहक नाहीत.

ग्राहकांची संख्या कमी

कल्याण-मुरबाड रोडवरील एका नामांकित हॉटेलच्या मालकाने सांगितले की, त्यांच्या हॉटेलमध्ये अद्ययावत सुविधा आहेत. एका ग्राहकाला २४०० रुपये आकारले जातात. त्याला त्यात चहा, नाश्ता दिला जातो. त्याची रूम सॅनिटाइझ केली जाते. सॅनिटायझर मशीन प्रवेशद्वाराजवळ लावले आहे. शिवाय, प्रत्येक खोलीत सॅनिटायझरची बाटली ठेवली आहे. प्रवेशद्वाराजवळ ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. त्याच्या शरीराचे तापमान जास्त असल्यास त्याला थेट रुग्णालयात पाठविले जाते. सरकारने दिलेल्या अटींचे पालन करून व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, ग्राहकसंख्या कमी आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे