शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर नाही, मग भगत द्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवीचे रवाळ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 15:30 IST

आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय, डॉक्टर नको भागत द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता.

ठाणे : ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे, आरोग्य संस्था मरणपंथाला आल्या आहेत. याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत, सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपचारासाठी डॉक्टर देण्यात शासन कुचकामी ठरल्याने श्रमजीवी संघटनेने संतप्त होऊन चक्क ग्रामीण भागातील पारंपरिक भगत यांचा पारंपरिक नवीन भगत तयार करण्याचा रवाळकार्यक्रमाचे आयोजन केले यात सुमारे 20 भगतांचा पदवीदान कार्यक्रम करत यांना आरोग्य सेवेत शासनाने नियुक्त करावे अशी मागणी करत शासनाचे लक्ष वेधले. तर, आदिवासी कष्टकरी माणूस हाय, माणूस हाय, डॉक्टर नको भागत द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता.

ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोवीस मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा पंचनामा केला. तेथील  विदारक वास्तवाचा संघटनेने पार पोस्टमार्टेमच केले आहे. या पाहणी दौऱ्यातील माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला. गरीब सामान्य माणूस उपचारावाचून तडफडत आहे, खाजगी संस्था उपचार तर देतात मात्र महागडी बिलं अनेकांना कर्जबाजारी बनवत आहेत.

हजारो कुपोषणग्रस्त बालकं, गर्भवती माता,नवजात अर्भक मृततुशय्येवर जात आहेत. मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाही. या उलट देशात-राज्यात मंदिर,मज्जिद,भोंगा,  दौरे, जात, धर्म ,पंथाचे वाद यावरच राजकारण सुरू आहे.  सत्ताधारी किंवा  विरोधक कोणीही गरीब सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत.  याबाबत श्रमजीवी संघटनेने व्यक्त केला आहे आणि आणि आरोग्य ही जीवनावश्यक सेवा प्रत्येक गरीब सामान्य रुग्णाला हक्काने मिळायलाच हवी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांना दर्जेदार मोफत उपचार मिळायलाच हवा यासाठी आता श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

श्रमजीवी संघटना संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  24 मे रोजी दिवसा तर 31 मे रोजी मध्यरात्री संघटनेने वेगवेगळ्या टीम बनवून केलेल्या पंचनामा यातून समोर आलेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, तब्बल एक हजारपेक्षा जास्त कार्यकते या कामासाठी फिरत होते. माहितीचे एकत्रीकरण करून प्रकाशित केलेला हा 'पोस्टमार्टेम' अहवाल म्हणजे आरोग्य संस्थेच्या मरणासन्न अवस्थेचा पोस्टमार्टेम रिपोर्टच म्हणावा लागेल.

दरम्यान, आरोग्य सेवेच्या या प्रश्नावर सोमवार ६ जून रोजी श्रमजीवी संघटनेने मोठे आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यात मरण पावलेल्या या आरोग्य व्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिक यांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे अशी उपरोधिक मागणी करत "भगतांचा पदवीदान सोहळा" म्हणजेच पारंपरिक 'रवाळ' (अंगात देव घेऊन जागर करण्याचा कार्यक्रम) ठाण्यात लक्षवेधी ठरले. रोज मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या निष्पाप रुग्णांना,बालकांना, गर्भवती मातांना झालेल्या मरणयातना आता थांबायला हव्यात यासाठी श्रमजीवी आक्रमक भूमिकेत दिसली.ठाणे-पालघर-नाशकात ६१ % मनुष्यबळ 

ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्यक्ष पंचनामा केलेल्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदांमध्ये आरोग्य सहाय्यक ५३ मंजूर पदांपैकी केवळ ३२ पदं भरलेली असून २१ पदं रिक्त आहेत आरोग्य सहाय्यिका ६५ मंजूर पदांपैकी ५२ पदं भरलेली असून १३ रिक्त आहेत . आरोग्य सेवकाची २४१ पदं मंजूर असून १५४ पदं भरलेली तर तब्बल ८७ पदं रिक्त आहेत तर आरोग्य सेविकेची मंजूर २९५ पदांपैकी २१० पदं भरलेली असून ८३ पदं रिक्त आहेत . जीएनएम च्या ४२ मंजूर पदांपैकी ३ ९ पदं भरलेली असून ३ पदं रिक्त आहेत. औषध निर्माता ४ ९ मंजूर पदांपैकी ३८ कार्यरत असून ११ पदं रिक्त आहेत . प्रयोग शाळा तंत्रज्ञ मंजूर ५ ९ पदांपैकी ४६ पदं भरलेली असून १३ पदं रिक्त आहेत. करण्यात आलेल्या सर्वेक्षणातीलब ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहयाक आणि कर्मचार्याच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदं भरलेली असून ४५५ पदं रिक्त आहेत. अर्थात ३ ९ % पदं हि रिक्त असून ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणे