चिकणघर : २७ गावांतून चौथ्या दिवशीही कोणत्याच पक्षाच्या अथवा अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरला नाही. संरक्षण हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी २७ गावांसाठी अर्ज भरण्याच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याने कोणी उमेदवार अर्ज नेण्यास अथवा जमा करण्यास पुढे आलेला नाही. याचप्रमाणे आॅनलाइनसुद्धा शुक्रवारी अर्ज आलेले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.
चौथ्या दिवशीही उमेदवारी अर्ज नाही
By admin | Updated: October 9, 2015 23:59 IST