शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेच्या अभय योजनेनंतर माफी नाही - आयुक्त मनिषा आव्हाळे 

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2025 20:57 IST

योजने अंतर्गत वसुलीचे टार्गेट २०० कोटी?

उल्हासनगर : जनमताचा आदर ठेवत महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्प्यात अभय योजना लागू केली. मात्र त्यानंतर थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाहीतर, माफी नसल्याचे संकेत आयुक्तानी दिले आहे.

 उल्हासनगर महापालिका उत्पन्न वाढविण्यासाठी तत्कालीन आयुक्तानी मालमत्ता कर विभागासाठी एकाच वर्षात दोन वेळा अभय योजना लागू केली. मात्र जानेवारी महिना अखेर विभागाची वसुली ७५ कोटी पेक्षा जास्त झाली नाही. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता थकबाकीची रक्कम ६०० कोटी पेक्षा जास्त दिसली. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने दंडूका उगारताच राजकीय नेत्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विभागासाठी अभय योजनेची मागणी लावून धरली. या मागणीसाठी आमदार कुमार आयलानी व पप्पू कलानी समर्थक आग्रही होते. 

अखेर... आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. अभय योजनेचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान आहे. मालमत्ता कर थकबाकीसह चालू रक्कमेची रक्कम ऐककलमी भरणा केल्यास, १०० टक्के विलंबशास्ती माफ केली जाणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च दरम्यान असणार असून थकबाकीसह रक्कमेची एककलमी रक्कम व २५ टक्के विलंब शुल्क भरल्यास ७५ टक्के विलंबशुल्क माफ होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मालमत्ता कर थकबाकी रक्कमेसह एकरक्कमी व ५० टक्के विलंबशुल्क रक्कम भरल्यास थकबाकी वरील ५० टक्के विलंबशुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेनंतरही थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाही. तर त्यांच्यावर कारवाईचे संकेत आयुक्त आव्हाळे यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर