शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

उल्हासनगर महापालिकेच्या अभय योजनेनंतर माफी नाही - आयुक्त मनिषा आव्हाळे 

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2025 20:57 IST

योजने अंतर्गत वसुलीचे टार्गेट २०० कोटी?

उल्हासनगर : जनमताचा आदर ठेवत महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्प्यात अभय योजना लागू केली. मात्र त्यानंतर थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाहीतर, माफी नसल्याचे संकेत आयुक्तानी दिले आहे.

 उल्हासनगर महापालिका उत्पन्न वाढविण्यासाठी तत्कालीन आयुक्तानी मालमत्ता कर विभागासाठी एकाच वर्षात दोन वेळा अभय योजना लागू केली. मात्र जानेवारी महिना अखेर विभागाची वसुली ७५ कोटी पेक्षा जास्त झाली नाही. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता थकबाकीची रक्कम ६०० कोटी पेक्षा जास्त दिसली. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने दंडूका उगारताच राजकीय नेत्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विभागासाठी अभय योजनेची मागणी लावून धरली. या मागणीसाठी आमदार कुमार आयलानी व पप्पू कलानी समर्थक आग्रही होते. 

अखेर... आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. अभय योजनेचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान आहे. मालमत्ता कर थकबाकीसह चालू रक्कमेची रक्कम ऐककलमी भरणा केल्यास, १०० टक्के विलंबशास्ती माफ केली जाणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च दरम्यान असणार असून थकबाकीसह रक्कमेची एककलमी रक्कम व २५ टक्के विलंब शुल्क भरल्यास ७५ टक्के विलंबशुल्क माफ होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मालमत्ता कर थकबाकी रक्कमेसह एकरक्कमी व ५० टक्के विलंबशुल्क रक्कम भरल्यास थकबाकी वरील ५० टक्के विलंबशुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेनंतरही थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाही. तर त्यांच्यावर कारवाईचे संकेत आयुक्त आव्हाळे यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर