शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

दुसऱ्या दिवशीही धरपकड सुरूच

By admin | Updated: February 16, 2017 01:56 IST

अंबरनाथ नगरपालिकेने मंगळवारी २२ नागरिकांना उघड्यावर प्रातर्विधीस बसले म्हणून कारवाई करत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने मंगळवारी २२ नागरिकांना उघड्यावर प्रातर्विधीस बसले म्हणून कारवाई करत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली. बुधवारी एकूण सात जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या सात जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. मात्र, पालिकेच्या या मोहिमेमुळे उघड्यावर प्रातर्विधीसाठी बसणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शहर हगणदारीमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहेत. पालिकेने सुविधा पुरवल्यानंतर नागरिकांनी उघड्यावर प्रातर्विधीस जाऊ नये, अशी अपेक्षा पालिका व्यक्त करत होती. तरीदेखील, अनेक नागरिक उघड्यावर जात असल्याने पालिकेच्या भरारी पथकाने या सर्व नागरिकांना ताकीद देत सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करण्याचा सल्ला दिला. सतत कारवाई करूनही नागरिकांची ही सवय मोडत नसल्याने अखेर कायदेशीर बाब म्हणून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम भरारी पथकाने सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी २२, तर दुसऱ्या दिवशी ७ नागरिकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारची कारवाई रोज होणार आहे. बुवापाडा भागात सर्वाधिक नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस बसत असल्याने त्याच ठिकाणी पालिकेने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी)