शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

उंबर्डे प्रकल्पात नवा कचरा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:35 IST

येरे माझ्या मागल्या; आधारवाडी डम्पिंगवर पुन्हा ढिगारे

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने उभारलेल्या उंबर्डे कचरा प्रकल्पात नव्याने कचरा घेणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा पुन्हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरच टाकला जात आहे. कचरासमस्या सोडवण्यासाठी प्रकल्प उभारूनही आधारवाडी डम्पिंग बंद होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे येरे माझ्या मागल्या, अशीच स्थिती कचरा व्यवस्थापनाविषयी दिसून येत आहे.आधारवाडी डम्पिंगवरील कचरा टाकण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्यासाठी मनपाने पर्यायी प्रकल्प उभारले आहेत. त्यापैकी बारावे प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर, उंबर्डे प्रकल्प हा ३५० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. मात्र, तो लोकवस्तीपासून जवळ असल्याने दुर्गंधी येत असल्याने तेथील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. तरीही महापालिकेने हा प्रकल्प राबविला आहे.आधारवाडी येथे दररोज ५७० मेट्रीक टनपेक्षा जास्त कचरा टाकला जातो. त्यापैकी २०० टन कचरा उंबर्डे प्रकल्पात प्रक्रियेसाठी टाकला जात होता. त्यामुळे आधारवाडी येथे कमी कचरा टाकला जात होता. परंतु, उंबर्डे कचरा प्रकल्पाचा नागरिकांना त्रास होत असल्याने या प्रकल्पात नव्याने कचरा घेण्याचे काम बंद करण्यात आले आहे. या वृत्ताला प्रशासनानेदेखील दुजोरा दिला आहे. परिणामी, २०० टन कचरा पुन्हा आधारवाडी येथे टाकला जात आहे. दरम्यान, उंबर्डे प्रकल्पात आतापर्यंत टाकलेल्या अडीच हजार मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. मात्र, आधारवाडी डम्पिंगवर पुन्ह कचरा टाकला जात असल्याने ते बंद करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता येणार नाही.कोरोनामुळे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य पडले मागेआधारवाडी डम्पिंगवरील कचरा बायो मायनिंग पद्धतीने डम्प केला जाईल. तसेच डम्पिंगवर उद्यान फुलविले जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगतानाच हे डम्पिंग मे महिन्यात बंद करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य मागे पडले आहे.

टॅग्स :dumpingकचरा