शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर नवीन रोपे

By admin | Updated: December 22, 2016 05:38 IST

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते.

कल्याण : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. परंतु, देखभालीअभावी ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावरील रोपे मरून गेली होती. याबाबत, ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत तेथे केडीएमसीने पुन्हा झाडांची नवीन रोपे लावली आहेत. सध्या या झाडांचे संवर्धन प्रशासनाकडून केले जात आहे.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त चालू वर्षात सव्वा लाख झाडे लावण्याचा संकल्प केडीएमसीने केला आहे. वृक्षारोपणाच्या विशेष मोहिमेत महापालिकेबरोबरच विकासक, सामाजिक संस्था, मंडळे, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, ज्येष्ठ नागरिक संस्था यांना वृक्षांची रोपे पुरवण्यात आली. रोपांची लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी याच संस्थांवर महापालिकेने टाकली आहे. उंबर्डे, बारावे, बल्याणी, नेतिवली टेकडी, डोंबिवली एमआयडीसी, २७ गावे, रस्त्यांलगत, महापालिका शाळा, महापालिकेची उद्याने, मैदानांमध्ये महापालिकेने वृक्षलागवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वृक्षारोपण करणाऱ्या व देखभाल करणाऱ्या संस्था, विकासकांना ट्री गार्ड्सवर स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर ट्री गार्ड्समध्ये लावलेली रोपे सुकून गेली होती. या रस्त्याच्या दुभाजकावर विकासकांनी गुजरात, हैदराबाद येथून आणलेली पाम ट्री लावली आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी रस्त्याला एक झालर प्राप्त झाली होती. मात्र, रस्त्याकडील ट्री गार्ड्समधील झाडे सुकल्याने या रस्त्याची शोभा गेली होती. महापालिका आणि संबंधित सामाजिक संस्थांचे या झाडांच्या देखभालीकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढवली होती. वृक्षारोपण करताना मोठ्या प्रमाणावर फोटोसेशन झाले. मात्र, लावलेल्या झाडांची निगा राखायची कोणी, असा सवाल वास्तव पाहता उपस्थित झाला होता. अखेर उशिरा का होईना, केडीएमसी प्रशासनाला जाग आली आहे. समांतर रस्त्यावर सुकलेल्या झाडांच्या जागेवर नव्याने झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांबरोबर अन्य काही झाडांना खतपाणी घालून संवर्धन केले जात आहे. (प्रतिनिधी)