शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

शिक्षक बदल्यांसाठी आता नवीन आदेश

By admin | Updated: March 15, 2017 02:26 IST

शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा नेहमीच वादाचा व चर्चेचा विषय म्हणून गाजतो. परंतु, आता आधीच्या अध्यादेशाचा विचार न करता ग्रामविकास विभागाने

सुरेश लोखंडे, ठाणेशिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा नेहमीच वादाचा व चर्चेचा विषय म्हणून गाजतो. परंतु, आता आधीच्या अध्यादेशाचा विचार न करता ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारीला नवीन अध्यादेश जारी करून दरवर्षी होणाऱ्या पाच टक्के प्रशासकीय (समायोजन) बदल्या कायमच्या रद्द केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार आहेत. शिक्षकांच्या या बदल्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतर अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र या दोन प्रकारचे वर्गीकरण करून त्यातील गावे व शाळा निश्चित कराव्या लागणार आहेत. यानुसार ३१ मेपर्यंत बदल्या कराव्या लागणार असून वेळीच अहवाल देण्याची सक्ती आहे. शाळेत, गावात पोहोचण्यासाठी दळणवळणाच्या सोयीसुविधा नसणे, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे, रस्ता करण्यास प्रतिकुल नसलेले गावे व त्यातील शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश होणार आहे. अवघड क्षेत्रात तीन वर्ष सलग सेवा केलेल्या शिक्षकाची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्राधान्याने करावी लागणार आहे. या शाळेत जागा रिक्त नसेल, तर तेथे एखाद्या शिक्षकाची सलग दहा वर्ष सेवा झालेली असल्यास ते शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. त्या रिक्त जागी संबंधीत शिक्षकाची बदली करावीच लागणार आहे. म्हणजे अवघड क्षेत्रातील शाळेत प्रत्येक शिक्षकाला तीन वर्ष सेवा करावीच लागणार आहे. त्यानंतरच त्यास सर्वसाधारण क्षेत्रातील पसंतीच्या शाळेवर बदलीचा अधिकार मिळणार आहे. दरवर्षी ३१ मेपर्यंत या बदल्या कराव्याच लागणार आहेत. अवघड क्षेत्रातील तीन वर्ष सेवा करणारे बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षकांप्रमाणेच विशेष संवर्ग शिक्षक भाग १ व भाग २ संवर्गातील शिक्षक सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र असतील. यामुळे शिक्षकाला आवडत्या शाळेत दीर्घकाळ सेवा करता येणार नसल्याचे उघड झाले आहे.