शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

डायघर-खिडकाळीत नवे घोडबंदर, ठामपाची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:19 IST

डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सागर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राबवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्तांनी या परिसराचा गुरुवारी पाहणी दौरा केला.

ठाणे : डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सागर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राबवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्तांनी या परिसराचा गुरुवारी पाहणी दौरा केला. यानंतर, आता या गावांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून या गावांना शहरी भागाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तोे महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. दिवा भागाचा ज्या पद्धतीने विकास आराखडा तयार करून तेथील विकासकामांना नोव्हेंबर महिन्याच्या महासभेत मंजुरी मिळाली, त्यानुसार आता डायघर आणि आजूबाजूच्या गावांचा नवे घोडबंदर म्हणून येत्या काळात विकास करणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.या गावांचा विकास करत असताना येथील अनधिकृत बांधकामे ही पालिकेसाठी मोठा चिंतेचा विषय असून तो सोडवण्यासाठीसुद्धा हालचाली केल्या जाणार आहेत.डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सागर्ली या गावांच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक बाबाजी पाटील, संतोष किणे, संतोष पाटील, गणेश म्हात्रे, गोविंद भगत यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन तेथील विकासकामांच्या अनुषंगाने चर्चा केली.त्यानंतर, या भागाचा पाहणी दौरा करण्याचे आदेश आयुक्तांनी दोनही अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, गुरुवारी या दोघांनीही या भागाचा पाहणी दौरा केला. एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने प्रवास करत असताना दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीत असूनही येथील बहुतांश भाग आजही कसा विकासापासून वंचित राहिला आहे, याची माहिती त्यांना या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मिळाली आहे.गटार, पायवाटा, रस्ते, शौचालये, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयीसुविधा यापासून ही गावे कोसो दूर असल्याची बाबही समोर आली.गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाखांच्या आसपास असून येथील रहिवाशांना कोणत्या मूलभूत सोयीसुविधांची गरज आहे, याची माहिती यावेळी घेण्यात आली. त्यानुसार, त्याआधारे आता या गावांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.>ही होणार विकासकामेविकास आराखड्यानुसार शीळ येथे उपप्रभाग कार्यालय निर्माण करणे, खिडकाळी आणि डायघर येथे दोन उद्यानांची निर्मिती करणे, खिडकाळी-डायघर येथे स्टेडिअम बांधणे व मैदाने विकसित करणे, शीळ आणि देसाई येथे आरोग्य केंद्रे बांधणे, पडले येथे ज्युनियर कॉलेज आणि शाळांची दुरुस्ती, डायघर येथील शाळेचे वाढीव मजल्याचे काम, देसाई येथे आरोग्य केंद्र, प्रसूतिगृह तसेच ट्रॉमा सेंटरचे बांधकाम, डायघर येथे आगरी समाजभवन बांधणे, या परिसरातील स्मशानभूमींचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण, परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते बांधणे, पदपथ आणि विद्युतकामे, पाणीपुरवठा, मलनि:सारण आदी कामे येत्या काळात केली जाणार आहेत. यासाठी किती खर्च येऊ शकतो, त्यादृष्टीने हा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.>अनधिकृत बांधकामांच्या जागेवर परवडणारी घरेया भागात सर्वात मोठी समस्या ही अनधिकृत बांधकामांची असून येथे सोयीसुविधांची वानवा असली, तरीही अनधिकृत बांधकामांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या बांधकामांचे करायचे काय, असा पेच सध्या पालिकेला सतावू लागला आहे. परंतु, या बांधकामांबाबत कोणती योजना राबवली जाऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर, परवडणाºया घरांची योजना राबवता येऊ शकते का,याचीही चाचपणी केली जाणार आहे.