शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

नवीन शिक्षण धोरण सर्वांसाठी अडचणीचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:42 IST

चंद्रशेखर मराठे : सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिका

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणातही परिवर्तनाची गरज होती, म्हणून १९७५ नंतर बऱ्याच मोठ्या काळानंतर आलेल्या नवीन शिक्षण धोरणाकडून खूप अपेक्षा होत्या. पण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षण संस्थांच्या दृष्टीने विचार केला तर या धोरणात प्रस्तावित केलेले बदल कसे अंमलात आणायचे याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीविषयी विशेषतः ११वी, १२वीबाबत गोंधळाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सतीश प्रधान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी केले.

समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या उद्घाटनावेळी प्राचार्य मराठे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, मोठ्या महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांबाबत काय धोरण असेल, याबाबत संदिग्धता आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काही विशेष सोयीसवलती या धोरणात स्पष्ट नाहीत. अशा रीतीने हे नवीन शिक्षण धोरण अनेक अंगाने सर्वांसाठी अडचणीचे आहे. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले, ‘सगळा देश लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त असताना, संसदेत चर्चा न करता घिसाडघाईने आदेश काढून मंजूर केलेले हे शिक्षण धोरण मुळातच लोकशाहीच्या संकेताविरुद्ध लागू केले गेले आहे. संविधानानुसार शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य सामायिक आहे. परंतु यापुढे ही तरतूद रद्द करून शिक्षणाच्या केंद्रीकरणाचा संविधानविरोधी घाट घातला जाणार आहे.’ 

उद्योगांचा शिक्षणातील हस्तक्षेप वाढेल nनव्या धोरणात नमूद केल्याप्रमाणे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा, ऑनलाइन अभ्यासाचा वापर हा या सरकारच्या खाजगीकरणाला उत्तेजना देण्याच्या व्यापक धोरणाचाच एक भाग आहे. मोठ्या उद्योगांचा शिक्षणातील हस्तक्षेप वाढेल आणि त्यांच्या नफेखोरीच्या प्रवृत्तीने शिक्षण सामान्य माणसांच्या कुवतीबाहेर जाईल. nशिक्षणात आधीच पुढे असलेला समाज त्यांना सहज उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांमुळे आणखीन पुढे जाईल आणि मुळातच आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेला वंचित समाज या सोयीसुविधा घेण्याची ऐपत नसल्याने व शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे राखीव जागा निरर्थक ठरणार असल्याने शिक्षणातून बाजूला पडेल आणि अजूनच मागे जाईल, अशी सार्थ भीती वाटते.