शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 9, 2024 19:32 IST

पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

ठाणे : पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ठाणे महानगरपालिका, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “विकास पत्रकारिता: शासन संवाद” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

ठाणे महानगरपालिका आयुक्त आभिजित बांगर म्हणाले की, शासन सेवेत पत्रकारांची महत्वाची भूमिका असते. शासनाने केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी पत्रकार हे खात्रीचे माध्यम आहेत. पत्रकारांचा प्रतिसाद हा नि:ष्पक्ष असतो. पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळते की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते. बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणे महत्वाचे आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे. कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट यांनी “समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता” या विषयावर तसेच, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ञ प्रा. श्रीकांत सोनावणे यांनी “डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन केले.सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. या कार्यशाळेस राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे