शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

नवी २७ हजार बेकायदा बांधकामे

By admin | Updated: February 3, 2016 02:15 IST

कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचिका दाखल झाल्यापासून शहरी भागात आत्तापर्यंत २६ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचिका दाखल झाल्यापासून शहरी भागात आत्तापर्यंत २६ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये गेल्या काही दिवसांत एक हजारपेक्षा जास्त बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे महापालिका हद्दीत नवीन बांधकामांना परवानगी देण्यास न्यायालयाने निर्बंध घातले असतानाही आदेश धाब्यावर बसवून बांधकामे सुरु आहेत.बेकायदा बांधकामातून महापालिकेला एक पैशाचे उत्पन्न मिळत नसल्याने सुमारे३ हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होती. त्यांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळत नसल्याने ही गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली. २००२ साली २७ गावे महापालिकेतून वगळली त्यावेळी २७ गाव परिसरात १० हजार बेकायदा बांधकामे होती. ही गावे महापालिकेतून वगळल्यानंतर त्याठिकाणच्या बेकायदा बांधकामावर जिल्हा परिषद प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. २७ गावे २००६ पासून एमएमआरडीए कार्यक्षेत्रात आल्याने एमएमआरडीएने २७ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. हा आराखडा मंजूर होण्यास डिसेंबर २०१४ साल उजाडले. सध्या ही गावे महापालिकेत असली तरी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा एमएमआरडीएकडेच आहे. या सगळ््या घोळामुळे बेकायदा बांधकामे बेधडकपणे उभारली गेली. तळ अधिक चार, पाच, सहा, सात आाणि आठ मजल्याच्या बेकायदा इमारती आजदे, सांगर्ली, सागाव, कोपर, नांदिवली, देसलेपाडा आदी परिसरात उभारल्या आहेत. एमएमआरडीएने कोणालाही परवानगी दिलेली नसल्याने बेकायदा बांधकामे उभी कशी राहिली असा प्रश्न आहे. एका बेकायदा इमारतीत २५ ते ३० सदनिका असतात. त्याची नोंदणी उपनिबंधकांकडे केली जाते. ती कशाच्या आधारे केली जाते. रेती उपसा करण्यावर सरकारीची बंदी आहे. बेकायदा रेती उपसा केला जात आहे. रेती सात हजार ब्रास व माती चार ते पाच हजाराला एक ट्रक या दराने विकली जाते. परिणामी सरकारी महसूल बुडतो. महिनाभरापूर्वी बेकायदा दुकानांच्या गाळ््यांना जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सील ठोकले होते. त्यानंतर त्यांनीच हे सील पुन्हा उघडले. बेकायदा बांधकाम प्रकरणाचे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी सांगितले की, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा महापालिकेने सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याची माहिती न्यायालयास सादर केली होती. त्यानंतर बेकायदा बांधकामे होऊ द्यायची नाही, असे न्यायालयाने महापालिका प्रशासनास बजावले होते. दरम्यानच्या काळात ९ हजार बेकायदा बांधकाम केल्याची माहिती पुराव्यासह न्यायालयास सादर केली. आजमितीस त्यात आणखीन वाढ झाली आहे. किमान २६ हजार बेकायदा बांधकामे महापालिका क्षेत्रात नव्याने झाली आहेत. समिती पे समिती सुरूच ठाणे जिल्हयातील बेकायदा बांधकाम प्रकरणी अग्रवाल समिती स्थापन करण्यात आली होती. त्याआधी काकोडकर समिती, नंदलाल समिती आणि नांगनुरे समितीने बेकायदा प्रकरणी राज्य सरकारला अहवाल सादर केले होते. समितीने दोषी ठरविलेल्याच्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. उच्च न्यायालयाने अग्यार समिती नेमली होती. या समितीने न्यायालयास अहवाल सादर केला आहे. हा अहवाल उघड करण्याची मागणी याचिकाकर्ते गोखले यांनी न्यायालयाकडे होती. तो अहवालही उघड करण्यात आलेला नाही.