शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

नेवाळीची मालकी संरक्षण खात्याकडेच

By admin | Updated: June 27, 2017 03:18 IST

नेवाळीच्या जागेवर संरक्षण खात्याचीच मालकी असून त्या जागेचा सात-बाराही त्यांच्याच नावे असल्याची माहिती महसूल खात्याती

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीच्या जागेवर संरक्षण खात्याचीच मालकी असून त्या जागेचा सात-बाराही त्यांच्याच नावे असल्याची माहिती महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. आधी ही जागा अधिग्रहित केली होती. नंतर तिचा मोबदला चुकता करून तिचे संपादन करण्यात आले. जमिनीचा मोबदला दिल्याने त्यावर संरक्षण खात्याची मालकी आहे. त्यामुळे या जमिनी परत करण्याचा मुद्दा गैरलागू असल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला. या जमिनीत झालेले फेरफार, त्यावर बिल्डर-चाळ माफियांनी केलेली अतिक्रमणे नव्याने तपासली जाणार असून संरक्षण खात्याच्या जमिनीत घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. या जमिनीचा सातबारा शेतकऱ्यांच्या नावावर नाही. त्यामुळे तो कोरा करण्याच्या मागणीत तथ्य नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ब्रिटीश सरकारने १९३९ सालच्या डिफेन्स अ‍ॅक्टद्वारे नेवाळी परिसरातील १,६७६ एकर जागा आधी अधिग्रहीत केली होती. पण नंतर ५०८ शेतकऱ्यांना चार लाख ७८ हजार १०७ रुपये नुकसानभरपाई देऊन तिचे संपादन केले. नुकसानभरपाई दिल्याची यादी महसूल खात्याकडे आहे. कल्याण-डोंबिवलीत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी द्वारली, भाल, पिसवली, आडीवली ढोकळी ही गावे धावपट्टी बाधित गावे आहेत.शेतकरी संस्थेचा पाठिंबा : ठाणे : नेवाळीतील आंदोलक शेतकऱ्यांना ठाणे परिसर शेतकरी संस्थेने पाठिंबा दिला आहे. सरकारने ही जमीन सध्याच्या बाजारभावानुसार नव्याने संपादित करावी आणि त्यात भूमीहीन होणाऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन किंवा टीडीआर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चाळ माफियांचे अतिक्रमणनेतिवली, पिसवली, नांदिवली येथे जागा शिल्लक नाही. नांदिवली, पिसवली, भाल, द्वारली, वसार आणि नेवाळी येथे चाळ माफियांनी चाळी उठवल्या आहेत. पण त्या अतिक्रमणांवर पोलीस, संरक्षण दल आणि महसूल विभागाने काहीही कारवाई केलेली नाही आणि शेतकऱ्यांनीही त्याविरोधात कधी आवाज उठविलेला नाही. याचिका प्रलंबितच : नेवाळीतील जागा शेतकऱ्यांना परत करण्यासाठी जमीन बचाव आंदोलन समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर १३ जूनला सुनावणी होणार होती. पण याचिका बोर्डावर आलीच नाही. तसेच त्यावर पुढील सुनावणीची तारीख मिळालेली नाही. या मुद्द्यावर १७ जणांनी विविध याचिका दाखल केल्या असून त्यांचे स्वरुप एकच आहे. अडीच कोटीचा भाव : नेवाळीत एक गुंठा जमिनीला सहा लाखांचा भाव सुरु आहे. एक एकर जमिनीत ४० गुंठे असतात. ते पाहता एकराचा भाव साधारणत: २ कोटी ४० लाखांवर जातो. एवढा भाव मिळत असल्यानेच संरक्षण खात्याकडून वापरात नसलेली जमीन शेतकऱ्यांना परत हवी आहे.