शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

उड्डाणपुलाच्या नाल्यावरील जाळी वाहनचालकांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:39 IST

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल सध्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या उड्डाणपुलावर पाणी साचू नये ...

अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल सध्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या उड्डाणपुलावर पाणी साचू नये यासाठी नगरपालिकेने हुतात्मा चौकाचे काँक्रीटीकरण करत असताना उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर नाला बनविला आहे. रस्त्याच्या मधून हा नाला जात असल्याने त्या नाल्यावर लोखंडी जाळी टाकण्यात आली आहे. या नाल्यावरील अनेक लोखंडाच्या पट्ट्या निघाल्याने ही जाळी धोकादायक अवस्थेत आहे. ही जाळी ज्या कॉंक्रीटीकरणावर घट्ट बसविण्यात आली होती, ते कॉंक्रीटीकरणदेखील तुटल्याने त्यावर वाहने आदळत आहेत. ज्या ठिकाणी हा नाला बनविण्यात आला आहे तो भाग आणि उड्डाणपुलाचा भाग यामध्ये चढउतार झाल्याने त्या ठिकाणी वाहनचालकांना उतरणीचा अंदाज येत नाही. त्यातच या उतरणीवर गेल्यावर वाहन जाळीवर जोरदार आदळले जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आलेल्या या नाल्यावर नव्याने जाळी बसविण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

दुसरीकडे ज्या ठिकाणी हा नाला बनविण्यात आले आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात उतार निर्माण झाल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. हा उतार कमी करण्यासाठी उड्डाणपुलाला जोडणाऱ्या कॉंक्रीटीकरणाची पुनर्बांधणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या रस्त्यावरील समस्या कायमस्वरूपी सोडवणे ही काळाची गरज ठरत आहे.

...............

उड्डाणपुलाच्या या समस्येबाबत अधिकाऱ्यांना त्याठिकाणी जाळीची तत्काळ दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जाळीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येणार असून, भविष्यात या ठिकाणचा धोकादायक उतार कमी करण्यासाठी पालिका नियोजन करीत आहे.

- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

---------------