शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

निळजे, दातिवली, आगासनचे प्रवासी रामभरोसे

By admin | Updated: July 17, 2017 01:17 IST

प्रवाशांची वाढती संख्या पाहता पनवेल-वसई मार्ग रेल्वेसाठी भरपूर उत्पन्न देणारा ठरू शकतो. रेल्वेला ते हवे आहे, पण त्या तुलनेत

प्रवाशांची वाढती संख्या पाहता पनवेल-वसई मार्ग रेल्वेसाठी भरपूर उत्पन्न देणारा ठरू शकतो. रेल्वेला ते हवे आहे, पण त्या तुलनेत सुविधा देण्याची त्यांची तयारी नाही. दिवा-पनवेल मार्गावरील स्थानके त्याचीच साक्ष देतात. येथील निळजे, दातिवली आणि आगासन या स्थानकातील प्रवाशांच्या पदरी कायमच उपेक्षा येते. ती केव्हा दूर होणार याचीच प्रदीर्घ प्रतीक्षा सुरू आहे. ज एका बाजूला प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपायोजना करत आहेत. प्रवासी टिकून रहावा यासाठी सातत्याने धडपड केली जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा दिवा-पनवेल मार्ग तयार केला. आज या मार्गावरून कोकण मार्गावरील गाड्या तसेच मालगाड्यांची वाहतूक सुरू असते. हा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर ठरला आहे. वसई किंवा तेथून पुढे जाण्यासाठी या मार्गाचा प्रवासी वापर करू लागले. पण या मार्गावर निळजे, आगासन आणि दातीवली स्थानके आहेत. पण आज त्यांची अवस्था पाहिली तर यांना रेल्वे स्थानक का म्हणावे असा विचार करावा लागतो. सुविधांचा अभाव, सुरक्षितता वाऱ्यावर, कुठे फलाटच नाही, जेथे फलाट आहे तेथे घाणीचे साम्राज्य, गवत उगवलेले. तरीही या स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी आहेत. दिवा-वसई मार्ग आता पनवेलपर्यंत गेला आहे. त्यामुळे पनवेल-वसई गाड्या या मार्गावरून धावू लागल्या. येथील मेमू गाड्यांना ठराविक वेळेत प्रचंड गर्दी असते. अशा या दिवा-पनवेल मार्गामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. बडया बिल्डरांकडून गृहप्रकल्प राबवले जात आहेत. रेल्वे स्थानकाच्या नावाखाली नागरिकांनीही घरे खरेदी केली. आज ना उद्या या स्थानकांचा विकास होईल अशी या ग्राहकांना भाबडी आशा आहे. प्रत्यक्षात या मार्गावरील प्रवासी हे रामभरोसे आहेत. तिन्ही स्थानके ओसाड आहेत. कधी होणार या स्थानकांचा विकास असा संतप्त सवाल येथील प्रवासी विचारत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखलही घेतली जात नाही. ही वस्तूस्थिती आहे.