शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निळजे, दातिवली, आगासनचे प्रवासी रामभरोसे

By admin | Updated: July 17, 2017 01:17 IST

प्रवाशांची वाढती संख्या पाहता पनवेल-वसई मार्ग रेल्वेसाठी भरपूर उत्पन्न देणारा ठरू शकतो. रेल्वेला ते हवे आहे, पण त्या तुलनेत

प्रवाशांची वाढती संख्या पाहता पनवेल-वसई मार्ग रेल्वेसाठी भरपूर उत्पन्न देणारा ठरू शकतो. रेल्वेला ते हवे आहे, पण त्या तुलनेत सुविधा देण्याची त्यांची तयारी नाही. दिवा-पनवेल मार्गावरील स्थानके त्याचीच साक्ष देतात. येथील निळजे, दातिवली आणि आगासन या स्थानकातील प्रवाशांच्या पदरी कायमच उपेक्षा येते. ती केव्हा दूर होणार याचीच प्रदीर्घ प्रतीक्षा सुरू आहे. ज एका बाजूला प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपायोजना करत आहेत. प्रवासी टिकून रहावा यासाठी सातत्याने धडपड केली जात आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा दिवा-पनवेल मार्ग तयार केला. आज या मार्गावरून कोकण मार्गावरील गाड्या तसेच मालगाड्यांची वाहतूक सुरू असते. हा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय फायदेशीर ठरला आहे. वसई किंवा तेथून पुढे जाण्यासाठी या मार्गाचा प्रवासी वापर करू लागले. पण या मार्गावर निळजे, आगासन आणि दातीवली स्थानके आहेत. पण आज त्यांची अवस्था पाहिली तर यांना रेल्वे स्थानक का म्हणावे असा विचार करावा लागतो. सुविधांचा अभाव, सुरक्षितता वाऱ्यावर, कुठे फलाटच नाही, जेथे फलाट आहे तेथे घाणीचे साम्राज्य, गवत उगवलेले. तरीही या स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी आहेत. दिवा-वसई मार्ग आता पनवेलपर्यंत गेला आहे. त्यामुळे पनवेल-वसई गाड्या या मार्गावरून धावू लागल्या. येथील मेमू गाड्यांना ठराविक वेळेत प्रचंड गर्दी असते. अशा या दिवा-पनवेल मार्गामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. बडया बिल्डरांकडून गृहप्रकल्प राबवले जात आहेत. रेल्वे स्थानकाच्या नावाखाली नागरिकांनीही घरे खरेदी केली. आज ना उद्या या स्थानकांचा विकास होईल अशी या ग्राहकांना भाबडी आशा आहे. प्रत्यक्षात या मार्गावरील प्रवासी हे रामभरोसे आहेत. तिन्ही स्थानके ओसाड आहेत. कधी होणार या स्थानकांचा विकास असा संतप्त सवाल येथील प्रवासी विचारत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखलही घेतली जात नाही. ही वस्तूस्थिती आहे.