शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

अनधिकृत इमारतींमधील गरजवंतांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:46 IST

भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.

- पंढरीनाथ कुंभार भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ९६४ अनधिकृत इमारती आढळून आल्या असून त्यापैकी ६२३ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यापैकी २७३ इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही शहर विकास व अतिक्रमण विभागाकडून कारवाईत चालढकल केली जात आहे. या इमारतींबाबत नगरसेवक, राजकीय नेते अथवा समाजसेवक बोलण्यास तयार नाहीत. राजकीय वैराचे उट्टे काढण्याकरिता तक्रारी करून अथवा माहितीच्या अधिकाराखाली तपशील गोळा करून इमारती तोडण्यासाठी पिच्छा पुरवला जातो. काही राजकीय पुढाºयांनी यासाठी भिवंडी कोर्ट ते मुंबई हायकोर्टापर्यंत याचिका करणारे दलाल पोसले आहेत. असेच एक प्रकरण गेल्या आठवड्यात बाहेर आले. काँग्रेस पक्षाच्या पुढाºयाच्या अनधिकृत इमारतीविरोधात आरपीआयच्या पुढाºयाने उच्च न्यायालयात दावा दाखल केला. हा दावा मागे घेण्याकरिता झालेली हाणामारी व परस्परविरोधी तक्रारी शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.अनधिकृत इमारतींचे बांधकाम थांबलेले नाही. पालिकेचा बांधकाम विभाग, प्रभाग अधिकारी व करमूल्यांकन विभागात काम करण्यासाठी काही लिपिक व अधिकाºयांमध्ये चढाओढ लागलेली असते. अनधिकृत बांधकामास जबाबदार कोणासही शिक्षा किंवा दंड न झाल्याने या विभागातील कर्मचारी निर्ढावले आहेत. चार दिवसांपूर्वी नवी वस्ती भागातील एका चार मजली इमारतीला हादरा बसून कॉलमला क्रॅक गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. या इमारतीच्या तळ मजल्यावर खाणावळ असून तळ मजल्यावरील इतर तीन गाळ्यांचा उपयोग वाणिज्यवापरासाठी केला जात आहे. चार मजल्यांच्या इमारतीत १६ कुटुंबे राहत होती. पालिकेच्या आपत्ती विभागाने या कुटुंबांना रस्त्यावर आणले. सात-आठ वर्षांपूर्वी घेतलेल्या खोलीतून एका रात्रीत रस्त्यावर आल्याने या कुटुंबांनी संताप व्यक्त केला. पालिकेने या कुटुंबांची पर्यायी निवाºयाची व्यवस्था केली नाही. पालिकेचे संक्रमण शिबिर नसल्याने या कुटुंबांनी आपल्या नातेवाइकांकडे तात्पुरता आसरा घेतला.गेल्या सात-आठ वर्षांपासून पालिका अधिकाºयांनी केवळ या इमारतीच्या विकासकाला नोटिसा देऊन शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. मंगळवारी ही घटना घडताच पालिकेने वेळ न दवडता इमारत तोडण्यास सुरुवात केली. भिवंडीत लोक अनधिकृत इमारतीत सर्रास राहत आहेत. मात्र, असा अपघात घडल्यावर रस्त्यावर येत असून पुन्हा अशाच एखाद्या नव्या अनधिकृत इमारतीत आसरा घेत आहेत.शहरातील बºयाच जागा वज्रेश्वरी संस्थानसह हिंदू व मुस्लिम ट्रस्टच्या आहेत. या जागांवर तसेच सरकारी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत इमारती बांधलेल्या आहेत. नगरविकास विभाग व बांधकाम विभाग नेहमीच दुर्लक्ष करत असतात. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतीला नळजोडण्या व वीजजोडण्या कशा उपलब्ध करून दिल्या जातात? अधिकारी व अनधिकृत इमारतींचे विकासक यांच्या साट्यालोट्याचा फटका रहिवाशांना बसत आहे. गरजवंताला अक्कल नसते, या न्यायानुसार भिवंडीत हजारो गरजवंत याच अनिश्चिततेचे बळी ठरले आहेत.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी