शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अनधिकृत इमारतींमधील गरजवंतांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:46 IST

भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.

- पंढरीनाथ कुंभार भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ९६४ अनधिकृत इमारती आढळून आल्या असून त्यापैकी ६२३ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यापैकी २७३ इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही शहर विकास व अतिक्रमण विभागाकडून कारवाईत चालढकल केली जात आहे. या इमारतींबाबत नगरसेवक, राजकीय नेते अथवा समाजसेवक बोलण्यास तयार नाहीत. राजकीय वैराचे उट्टे काढण्याकरिता तक्रारी करून अथवा माहितीच्या अधिकाराखाली तपशील गोळा करून इमारती तोडण्यासाठी पिच्छा पुरवला जातो. काही राजकीय पुढाºयांनी यासाठी भिवंडी कोर्ट ते मुंबई हायकोर्टापर्यंत याचिका करणारे दलाल पोसले आहेत. असेच एक प्रकरण गेल्या आठवड्यात बाहेर आले. काँग्रेस पक्षाच्या पुढाºयाच्या अनधिकृत इमारतीविरोधात आरपीआयच्या पुढाºयाने उच्च न्यायालयात दावा दाखल केला. हा दावा मागे घेण्याकरिता झालेली हाणामारी व परस्परविरोधी तक्रारी शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.अनधिकृत इमारतींचे बांधकाम थांबलेले नाही. पालिकेचा बांधकाम विभाग, प्रभाग अधिकारी व करमूल्यांकन विभागात काम करण्यासाठी काही लिपिक व अधिकाºयांमध्ये चढाओढ लागलेली असते. अनधिकृत बांधकामास जबाबदार कोणासही शिक्षा किंवा दंड न झाल्याने या विभागातील कर्मचारी निर्ढावले आहेत. चार दिवसांपूर्वी नवी वस्ती भागातील एका चार मजली इमारतीला हादरा बसून कॉलमला क्रॅक गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. या इमारतीच्या तळ मजल्यावर खाणावळ असून तळ मजल्यावरील इतर तीन गाळ्यांचा उपयोग वाणिज्यवापरासाठी केला जात आहे. चार मजल्यांच्या इमारतीत १६ कुटुंबे राहत होती. पालिकेच्या आपत्ती विभागाने या कुटुंबांना रस्त्यावर आणले. सात-आठ वर्षांपूर्वी घेतलेल्या खोलीतून एका रात्रीत रस्त्यावर आल्याने या कुटुंबांनी संताप व्यक्त केला. पालिकेने या कुटुंबांची पर्यायी निवाºयाची व्यवस्था केली नाही. पालिकेचे संक्रमण शिबिर नसल्याने या कुटुंबांनी आपल्या नातेवाइकांकडे तात्पुरता आसरा घेतला.गेल्या सात-आठ वर्षांपासून पालिका अधिकाºयांनी केवळ या इमारतीच्या विकासकाला नोटिसा देऊन शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. मंगळवारी ही घटना घडताच पालिकेने वेळ न दवडता इमारत तोडण्यास सुरुवात केली. भिवंडीत लोक अनधिकृत इमारतीत सर्रास राहत आहेत. मात्र, असा अपघात घडल्यावर रस्त्यावर येत असून पुन्हा अशाच एखाद्या नव्या अनधिकृत इमारतीत आसरा घेत आहेत.शहरातील बºयाच जागा वज्रेश्वरी संस्थानसह हिंदू व मुस्लिम ट्रस्टच्या आहेत. या जागांवर तसेच सरकारी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत इमारती बांधलेल्या आहेत. नगरविकास विभाग व बांधकाम विभाग नेहमीच दुर्लक्ष करत असतात. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतीला नळजोडण्या व वीजजोडण्या कशा उपलब्ध करून दिल्या जातात? अधिकारी व अनधिकृत इमारतींचे विकासक यांच्या साट्यालोट्याचा फटका रहिवाशांना बसत आहे. गरजवंताला अक्कल नसते, या न्यायानुसार भिवंडीत हजारो गरजवंत याच अनिश्चिततेचे बळी ठरले आहेत.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी