शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शाळांचा वीजपुरवठा ग्रामपंचायतींच्या खांद्यावर!, डिजिटल स्कूलसाठी प्रशिक्षकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:28 IST

ठाणे : चोखंदळपणाने आधुनिकेची वाट धरणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकामागून एक शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला.

ठाणे : चोखंदळपणाने आधुनिकेची वाट धरणा-या ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकामागून एक शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला. मात्र वीजबील रखडल्यामुळे बहुतांशी शाळांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी दिले. या वृत्ताची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अखेर गावातील शाळांच्या वीज पुरवठ्यासह वीज भरण्याची जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात प्रथमच ठाणे जि.प.च्या शाळा डिजिटल झाल्याची घोषणा राज्यपाल ठाणे जिल्हा दौºयात करणार होते. सुमारे ७७ शाळांचा वीज पुरवठा खंडीत असल्याचे वृत्त दरम्यान प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत आता गावातील शाळांच्या सुरळीत वीज पुरवठ्यासह वीज बिलाची रक्कम व शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्यातील ४३० शाळांवर ठाणे जिल्हा परिषदेने सोपवली आहे. हा निर्णय नुकताच घेतल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.वीज बीलाची रक्कम थकवल्यामुळे शाळांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने वेळोवेळी केली आहे. यामुळे सुमारे दोन-दोन वर्षे शाळेत लाइट, पंखे बंद व संगणक एलसीडी प्रोजेक्टरदेखील धूळ खात पडून होते. यास ठाणे जिल्हा परिषदेचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचा आरोप तत्कालीन आ. रामनाथ मोते यांनी केला आहे. यामुळे डिजिटल शाळांचे भवितव्य अल्पजीवी ठरण्याची भीती आहे.>वीजबिलांच्या रकमेची तरतूदच नाहीकल्याण पं.स.च्या कार्यकक्षेतील वीज पुरवठा खंडीत केलेल्या ७७ शाळांचे १७ लाख ७२ हजार १४३ विजेचे बिल थकल्याने येथील वीजेचे मीटर काढून नेल्याने वीज पुरवठा खंडीत होता. यामुळे ९७ शाळांमधील संगणक धूळखात पडून होते.शाळांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासह त्यांच्या वीज बिलांच्या रकमेसाठी तरतूद न करताच ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागाने शाळा डिजिटल करण्याचा सपाटा लावला आहे; पण आता वीज बील भरण्याची जबाबदारी ग्राम पंचायतींवर टाकली आहे. त्या विरोधातही काही शिक्षक बंड पुकारण्याच्या प्रयत्नात असून, प्रशिक्षक दिल्याशिवाय मुलांना डिजिटल शिक्षण देता येणार नसल्याचे लेखीसुद्धा काही संघटनांनी जि.प.ला दिले आहे.