शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

देशाचे अखंडत्व टिकविणाऱ्या नेतृत्वाची गरज- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:28 IST

देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

डोंबिवली : देशाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा सारख्या नेतृत्वाची गरज आहे. या देशाचे अखंडत्व टिकले पाहिजे. देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे मुंबई विभागाचे राष्ट्रीय अधिवेशन व प्रचार सभा रविवारी होरायझन सभागृहात झाली. या वेळी चव्हाण बोलत होते. समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबरला पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम झाला.या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेश मोरे, संस्था समन्वयक संजय पाखले, विजयकुमार वाणी, कैलास वाणी, राजेश कोठावदे, अनिल चितोडकर, अजय मालपुरे, निलेश पूरकर, आर. एल. वाणी, शामकांत शेंडे, शशिकांत येवले, अभय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, सगळ्यांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने समाजाने हे अधिवेशन घेतले आहे. ग्रामीण भागातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिवेशनाचा लाभ होणार आहे. तसेच या अधिवेशनाद्वारे देशाला चांगला पंतप्रधान कसा लाभला पाहिजे हे एक सत्र घेतले तर त्यांचा फायदा पुढच्या पिढीला होईल. देशाला मार्गदर्शन ठरू शकतील, अशी पाच वर्षे तुम्हाला आणि आम्हाला ठरवायची आहेत. तो निर्णय चुकला तर अडचणी येऊ शकतात. आपण सर्वांनी ‘भारतमाता की जय’ या मंत्राबरोबर चालणे गरजेचे आहे.खा. शिंदे म्हणाले, कल्याण व डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर वाणी समाज आहे. या सर्वांना अधिवेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम होत आहे. वाणी समाज हा व्यवसाय करण्यासाठी ओळखला जातो. परंतु, मराठी माणूस आता सर्व व्यवसायात आहे. मराठी माणसाला ती ओळख वाणी समाजाने करून दिली आहे.आदिशक्तीला कमी लेखू नकाआमदार भोईर म्हणाले, महिलांची खरी ताकद या अधिवेशनात दिसून येणार आहे. चांगल्या प्रकारचे कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम महिलांमध्ये आहे. त्यामुळे आदिशक्तीला कमी लेखण्याचे काम करू नका. सर्वपक्षीय नेते येतात तेव्हा भरभरून देण्याची ताकद असते. तुमच्या सर्व मागण्या तिथे पूर्ण होतील. मी आमदार म्हणून अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली