शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

देशाचे अखंडत्व टिकविणाऱ्या नेतृत्वाची गरज- रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:28 IST

देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

डोंबिवली : देशाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा सारख्या नेतृत्वाची गरज आहे. या देशाचे अखंडत्व टिकले पाहिजे. देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे मुंबई विभागाचे राष्ट्रीय अधिवेशन व प्रचार सभा रविवारी होरायझन सभागृहात झाली. या वेळी चव्हाण बोलत होते. समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबरला पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम झाला.या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेश मोरे, संस्था समन्वयक संजय पाखले, विजयकुमार वाणी, कैलास वाणी, राजेश कोठावदे, अनिल चितोडकर, अजय मालपुरे, निलेश पूरकर, आर. एल. वाणी, शामकांत शेंडे, शशिकांत येवले, अभय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, सगळ्यांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने समाजाने हे अधिवेशन घेतले आहे. ग्रामीण भागातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिवेशनाचा लाभ होणार आहे. तसेच या अधिवेशनाद्वारे देशाला चांगला पंतप्रधान कसा लाभला पाहिजे हे एक सत्र घेतले तर त्यांचा फायदा पुढच्या पिढीला होईल. देशाला मार्गदर्शन ठरू शकतील, अशी पाच वर्षे तुम्हाला आणि आम्हाला ठरवायची आहेत. तो निर्णय चुकला तर अडचणी येऊ शकतात. आपण सर्वांनी ‘भारतमाता की जय’ या मंत्राबरोबर चालणे गरजेचे आहे.खा. शिंदे म्हणाले, कल्याण व डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर वाणी समाज आहे. या सर्वांना अधिवेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम होत आहे. वाणी समाज हा व्यवसाय करण्यासाठी ओळखला जातो. परंतु, मराठी माणूस आता सर्व व्यवसायात आहे. मराठी माणसाला ती ओळख वाणी समाजाने करून दिली आहे.आदिशक्तीला कमी लेखू नकाआमदार भोईर म्हणाले, महिलांची खरी ताकद या अधिवेशनात दिसून येणार आहे. चांगल्या प्रकारचे कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम महिलांमध्ये आहे. त्यामुळे आदिशक्तीला कमी लेखण्याचे काम करू नका. सर्वपक्षीय नेते येतात तेव्हा भरभरून देण्याची ताकद असते. तुमच्या सर्व मागण्या तिथे पूर्ण होतील. मी आमदार म्हणून अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली