शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

‘सीएए’तील चांगले-वाईट लोकांना समजावून सांगण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:05 IST

राम नाईक यांचे मत : ठाण्यात ‘अभाविप’चे ५४ वे अधिवेशन

ठाणे : पुस्तकी किडा न होता सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूला, समोर काय होते, याची जाणीव विद्यार्थ्यांकडे असायला हवी. घडणाऱ्या घटनांवर त्यांनी आपले मत मांडायला पाहिजे. आताही घडत असलेल्या नागरिकत्व कायदा, सीएएविषयी प्रथम समजून घ्या. त्यानंतर त्यातील चांगले काय, वाईट काय, हे लोकांपुढे जाऊन सांगण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांना केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ५४ वे कोकण प्रदेश अधिवेशन स्व.प्रा. मोहन आपटेनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सुरू आहे. या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  अभाविपचे हे ५४ वे अधिवेशन म्हणजे हा काही छोटा काळ नाही. एबीव्हीपीचे नियमित दरवर्षी अधिवेशन घेत आहेत. अन्य काही संघटना केवळ कागदावर, फोटोत दिसत असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन वयातच वैचारिक बैठक निर्माण करून आजूबाजूला घडणाºया घटनांवर विचार करून मत मांडण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. यावेळी नाईक यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणदेखील विद्यार्थ्यांपुढे कथन केली.दरम्यान, यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, हरीश दुधाडे, एबीव्हीपीचे अध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदींचीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर भाषणे झाली.चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी चार मंत्रच्यावेळी नाईक यांनी त्यांच्या शालेय जीवनातील रोज २५ सूर्यनमस्कार घालण्याची शिस्तही यावेळी विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. तर, चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी स्माइल म्हणजे हसतमुख राहिले पाहिजे, यासह चांगले काम करणाऱ्यांचे कौतुककेले पाहिजे.च्अहंकार बाळगून दुसºयांविषयी वाईट बोलू नये आणि कोणतेही काम अधिक चांगले कसे होईल, याचा मार्ग शोधत राहिला पाहिजे आदी चार मंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

टॅग्स :thaneठाणे