शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘सीएए’तील चांगले-वाईट लोकांना समजावून सांगण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:05 IST

राम नाईक यांचे मत : ठाण्यात ‘अभाविप’चे ५४ वे अधिवेशन

ठाणे : पुस्तकी किडा न होता सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूला, समोर काय होते, याची जाणीव विद्यार्थ्यांकडे असायला हवी. घडणाऱ्या घटनांवर त्यांनी आपले मत मांडायला पाहिजे. आताही घडत असलेल्या नागरिकत्व कायदा, सीएएविषयी प्रथम समजून घ्या. त्यानंतर त्यातील चांगले काय, वाईट काय, हे लोकांपुढे जाऊन सांगण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांना केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ५४ वे कोकण प्रदेश अधिवेशन स्व.प्रा. मोहन आपटेनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सुरू आहे. या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  अभाविपचे हे ५४ वे अधिवेशन म्हणजे हा काही छोटा काळ नाही. एबीव्हीपीचे नियमित दरवर्षी अधिवेशन घेत आहेत. अन्य काही संघटना केवळ कागदावर, फोटोत दिसत असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन वयातच वैचारिक बैठक निर्माण करून आजूबाजूला घडणाºया घटनांवर विचार करून मत मांडण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. यावेळी नाईक यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणदेखील विद्यार्थ्यांपुढे कथन केली.दरम्यान, यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, हरीश दुधाडे, एबीव्हीपीचे अध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदींचीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर भाषणे झाली.चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी चार मंत्रच्यावेळी नाईक यांनी त्यांच्या शालेय जीवनातील रोज २५ सूर्यनमस्कार घालण्याची शिस्तही यावेळी विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. तर, चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी स्माइल म्हणजे हसतमुख राहिले पाहिजे, यासह चांगले काम करणाऱ्यांचे कौतुककेले पाहिजे.च्अहंकार बाळगून दुसºयांविषयी वाईट बोलू नये आणि कोणतेही काम अधिक चांगले कसे होईल, याचा मार्ग शोधत राहिला पाहिजे आदी चार मंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

टॅग्स :thaneठाणे