शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कळवा-मुंब्य्रात राहणार राष्ट्रवादीचा वरचष्मा

By admin | Updated: January 9, 2017 06:46 IST

ठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघात जरी शिवसेना-भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार असली, तरी कळवा, मुंब्रा या मतदारसंघात

अजित मांडके / ठाणेठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघात जरी शिवसेना-भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार असली, तरी कळवा, मुंब्रा या मतदारसंघात गेली १० वर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकून आहे. मुंब्य्रात दोन्ही काँग्रसची ताकद समसमान असली, तरी गेल्या काही महिन्यात बदलेल्या राजकीय गणितांचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात आघाडी आणि कळवा-मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. या भागात राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे वर्चस्व कमी आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच सरस ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने कळव्याकडे थोडया प्रमाणात लक्ष केंद्रीत केल. पण मुंब्य्रावर फारसे लक्ष दिलेले नाही. एमआयएम आणि सपा या ठिकाणी मतांची विभागणी करेल. त्याचा फायदा आपल्याला उठवता येईल अशी त्यांची अटकळ आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ म्हणजे माजी मंत्री आणि ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला. मागील निवडणुकीत अनेक समीकरणे त्यांच्याविरोधात होती. सत्ताधाऱ्यांनी सपासह, एमआयएम आणि येथे अपक्ष रिंगणात उतरवून आव्हाडांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे ठरविले. परंतु त्यांनी या सर्वांना सुरुंग लावला. देशासह राज्यात भाजपाचे वारे वाहत असतांनादेखील कळवा, मुंब्रा मतदारसंघावर राष्ट्रवादीने वरचष्मा कायम ठेवला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८५ हजार ४०७ मते मिळाली, तर शिवसेनेचे दशरथ पाटील यांना ३८ हजार ४१२ मते मिळाली. मनसेच्या महेश साळवी यांना केवळ २ हजार ७८३, भाजपचे अशोक भोईर यांना १२ हजार २३१, एमआयएमचे अश्रफ मुलानी यांना १४ हजार ७१२, कॉंग्रेसचे यासीम कुरेशी यांना ३ हजार ७१७ मते मिळाली. खरी लढत जितेंद्र आव्हाड विरूद्ध पाच पक्ष अशी होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. पण आव्हाड ४७ हजार ४८ मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना अपक्ष लढण्याच्या तयारीत असली तरी त्यांची येथे फारशी डाळ शिजेल, असे काही वाटत नाही. भाजपासुद्धा कळव्यावर लक्ष देऊन आहे. मुंब्य्राकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. एमआयएम आणि सपादेखील नशीब आजमावणार असल्याने मतांच्या टक्केवारीत काहीसा फरक पडू शकतो. एकूणच कळवा-मुुंब्य्रात सध्या तरी राष्ट्रवादी सरस असल्याची स्थिती आहे. नव्या कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने बालेकिल्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसला धक्का देत राष्ट्रवादीने राजन किणे यांच्यासह अनेकांना राष्ट्रवादीत खेचून आणल्याने येथील गणिते राष्ट्रवादीच्या बाजुने झुकल्याचे चित्र आहे.