शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

राष्ट्रवादीतील बंड शमता शमेना

By admin | Updated: June 27, 2017 03:08 IST

पक्षाला लागलेल्या गळतीत बहुतांश नगरसेवकांनी बाहेरची वाट धरल्यानंतर, गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनी पक्षाला रामराम ठोकल्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : पक्षाला लागलेल्या गळतीत बहुतांश नगरसेवकांनी बाहेरची वाट धरल्यानंतर, गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनी पक्षाला रामराम ठोकल्यावर राष्ट्रवादीतील उरलीसुरली नेतेमंडळीही बाहेर पडली. पालिका निवडणुकीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी फारशी चमकदार कामगिरी करेल, अशी शक्यता मावळल्यानंतरही पक्षाचे नेते लक्ष देत नसल्याने ज्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता, त्यांच्याच नाकदुऱ्या काढून अखेर राष्ट्रवादीतील वाद संपल्याचे जाहीर करण्यात आले. जे उरले त्यांना निष्ठावंत असे संबोधून गटबाजी करणाऱ्यांना ‘चालते व्हा’ असा इशारा देत पक्षाच्या नेत्यांनी ऐक्यावर शिक्कामोर्तब केले. सध्याचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी गटबाजी संपल्याचे आणि पक्ष सोडणार नसल्याचे जाहीर केले असले तरी अन्य गटांनी मात्र पाटील यांना हटवण्याची भूमिका मांडली आहे. ती मान्य न झाल्यास त्यासाठी येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेतली जाणार असून त्यात ही मागणी मांडली जाणार आहे. पाटील हेच पक्षविरोधी कारवाया करीत असून त्यांना पदावरून दूर केल्याशिवाय पक्ष टिकणे अवघड असल्याचे म्हणणे या नेत्यांनी मांडले. पक्षाचा प्रभाव न उरल्याने, उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ येणार असून निवडणुकीसाठी खर्च करण्यास एकही नेता पुढे येत नसल्याने पक्षातील उरल्यासुरल्या नेत्यांनीही पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. तो जाहीररित्या सर्वत्र छापून आल्याने वरिष्ठांनी धावपळ करत त्यांची समजूत काढली आणि इशारा देणाऱ्यांनीच गटबाजी करणाऱ्यांना चालते व्हा असे सांगत सारे आलबेल असल्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना गटबाजीत समाधान मानणारे नेते कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या एकाधिकारीशाहीमुळेच पक्षाची पडझड होऊ लागल्याचे मत निष्ठावंतांनी मांडले, पण हे नेते कोण ते मात्र जाहीर करण्यात आले नाही.जिल्हाध्यक्षपद रिक्त झाल्याने निष्ठावंतांनी ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व व माजी उपमहापौर जयंत पाटील यांचे नाव सुचविले. त्याला वरिष्ठांकडून मान्यता मिळाली. पण त्यानंतर पक्षात अस्वस्थता वाढली. ज्यांनी पाटील यांना विरोध केला, त्यांच्या कारवाया थांबत नसल्याने पाटील यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला. त्यांच्या राजीनाम्याचा इशारा जाताच वरिष्ठांनी विनवण्या करत रविवारी बैठक घेतली.त्या बैठकीनंतर पक्षातीलच काही वरिष्ठ आणि निष्ठावंतांची दुसरी बैठक पार पडली. त्यात पक्षाच्या वाताहतीला जबाबदार ठरणाऱ्यांनी चालते व्हावे, असा इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी संपवू देणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. यामुळे काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या नाट्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाटील यांना रोखण्यात यश आल्याचे पक्षाने जाहीर केले, पण त्याच्यामुळेच पक्षातील नेते बाहेर पडत असल्याचे सांगत दुसऱ्या गटाने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद ठेवण्यास विरोध केला आहे. त्यामुळे दोन दिवसात नेतृत्त्वबदल न झाल्यास असंतुष्टांनी पक्ष सोडण्याचा किंवा बंडाचा पवित्रा घेण्याचे जाहीर केले आहे.