शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

अपयशी पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रवादीचे पानिपत, कार्यकर्त्यांनी वाजवली धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:01 IST

ठाण्यात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चेकमेट देण्यासाठी गणेश नाईक यांच्या गटातील संजय वढावकर यांना कार्याध्यक्षपद दिल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

ठाणे : ठाण्यात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चेकमेट देण्यासाठी गणेश नाईक यांच्या गटातील संजय वढावकर यांना कार्याध्यक्षपद दिल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. नाराज पदाधिकाºयांनी तर पक्ष कार्यालयात पाय न ठेवण्याची सूचना त्यांना केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतही नाईक गटातील पदाधिकाºयांनाच पुन्हा संधी दिल्याने त्या ठिकाणीसुद्धा नाराजी पसरली आहे.मागील तीन ते चार वर्षांत नाईक यांच्या खांद्यावर ज्या-ज्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती, त्या-त्या निवडणुकांत राष्टÑवादीचे पानिपतच झाले आहे. त्यामुळे पुन्हा श्रेष्ठींनी अशा अपयशी पदाधिकाºयांवर मेहरनजर कशासाठी केली, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचा परिणाम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत राष्टÑवादीला भोगावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.मागील काही महिने प्रलंबित असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या नेमणुका सोमवारी जाहीर झाल्या. यामध्ये ठाणे शहराध्यक्षपदी पुन्हा आनंद परांजपे यांना कायम ठेवण्यात आले. परंतु, परांजपे किंबहुना आव्हाडांना शह देण्यासाठी नाईक फॅमिलीने संजय वढावकर यांच्या नावाची शिफारस करून कार्याध्यक्षपद मिळवले. दुसरीकडे दशरथ तिवरे (ठाणे ग्रामीण), रमेश हनुमंते (कल्याण-डोंबिवली), ज्योती कलानी (उल्हासनगर) आणि खलीद गुड्डू - भिवंडी शहर अध्यक्ष आणि अनिल फडतरे (कार्याध्यक्ष) अशा नियुक्त्या झाल्या आहेत. हे सर्व नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु, याच मंडळींचे मागील काही निवडणुकांतील काम पाहता राष्टÑवादी वाढण्याऐवजी कमीच झाली आहे.एकेकाळी जिल्हा परिषदेवर कित्येक वर्षे राष्टÑवादीचे वर्चस्व होते. परंतु, मागील निवडणुकीत राष्टÑवादी येथे तिसºया क्रमांकावर फेकली गेली. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी गणेश नाईक यांच्या खांद्यावर होती, तर ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून दशरथ तिवरे हेच होते. वास्तविक, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना त्यांना पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची बक्षिसी देण्यात आली. कल्याण-डोंबिवलीतही राष्टÑवादीने पुन्हा रमेश हणुमंते यांच्यावर विश्वास दाखवला. मागील महापालिका निवडणुकीत नाईक यांच्यावरच येथील जबाबदारी होती. परंतु, नगरसेवकांची संख्या केवळ दोन झाली. याला जबाबदार कोण होते, असा सवाल आता येथील कार्यकर्ते करू लागले आहेत. राष्टÑवादीचे येथे पानिपत झाले असताना पुन्हा त्यांनाच शहराध्यक्षपद कसे काय, असा सवालही केला जाऊ लागला आहे. भिवंडीतही राष्टÑवादीचे नऊ नगरसेवकांवरून झीरोवर खाते आले आहे. येथील निवडणुकीची जबाबदारीसुद्धा नाईक आणि त्यांचे समर्थक शहराध्यक्ष खलीद गुड्डू यांच्यावर होती. परंतु, ते अपयशी ठरले. उल्हासनगरमध्येही राष्टÑवादीची सत्ता होती. ती जाऊन याठिकाणी केवळ चार नगरसेवक निवडून आले. त्यातही आता पुन्हा ज्योती कलानी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला. परंतु, कलानी सध्या राष्टÑवादीत आहेत की भाजपात, अशी चर्चा येथे नेहमीच सुरूआहे. एकूणच ज्याज्या ठिकाणी शहराध्यक्षांच्या फेरनियुक्त्या झाल्या आहेत, ते सर्वच शहराध्यक्ष सर्वच पातळ्यांवर फेल ठरले आहेत. किंबहुना, याला जबाबदार नाईक अ‍ॅण्ड फॅमिली असल्याचा सूर राष्टÑवादीची नाराज मंडळी करत आहेत. असे असताना पुन्हा त्याच व्यक्तींवर श्रेष्ठींनी विश्वास दाखवल्याने राष्टÑवादीचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाच ते करू लागले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गढूळ वातावरणएकीकडे जिल्ह्यात राष्टÑवादीचे पानिपत होत असतानाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी राष्टÑवादीच्या विद्यमान १० ते १२ नगरसेवकांनी इतर पक्षांत प्रवेश केला होता. अशा परिस्थितीतही ठाण्यात परांजपे आणि आव्हाडांच्या नेतृत्वाखाली एक जागा जास्तीची जिंकत नगरसेवकांची संख्या ३५ झाली. आता अचानक संजय वढावकर यांची निवड झाल्याने ठाण्यात राष्टÑवादीचे वातावरण गढूळ झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या