शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

मुलुंड टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:44 IST

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.

ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.मुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गत आठवड्यात हाती घेतले. हे काम साधारणत: दोन महिने चालणार आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. अतिशय रहदारीचा हा मार्ग बंद केल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. ठाणे शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा मुद्दा उचलून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी सकाळी मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, शानू पठाण, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजा राजपूरकर, अनुसूचित जाती सेलचे कैलास हावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, हेमंत वाणी, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रवी पालव, कुलदीप तिवारी, समीर भोईर यांच्यासह शहर कार्यकारिणीचे सदस्य आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली आणि आनंदनगर (मुलुंड) टोलनाक्यावरील वसुली थांबवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी मागणी पूर्ण न झाल्यास कायदा हातात घेऊन टोलनाके खुले करण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानुसार, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलन सुरू करण्यात आले. टोलवसुलीसाठी थांबवलेली वाहने या आंदोलनामुळे टोल न घेताच सोडण्यात आली. मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ऐरोली, शीळफाटामार्गे वळवण्यात आली आहे. मात्र, या पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यासाठी शासन जबाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी या वेळी केला.>पालकमंत्र्यांवर आरोपबायपास दुरुस्तीच्या कालावधीमध्ये वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी ऐरोली किंवा मुलुंडपैकी एकच टोलनाका सुरू राहील, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्यांची घोषणा हवेतच विरल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही टोल मान्य नसून बायपासचे काम सुरू होईपर्यंत येथील वसुली होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. पक्षाचे आंदोलन सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे येथून मार्गस्थ झाले. मात्र, त्यांनी आंदोलनाबाबत साधी विचारपूसही केली नाही. हे माणुसकीहीनतेचे लक्षण असल्याचा आरोपही आव्हाड यांनी या वेळी केला.>यापुढे गनिमी काव्यानेटोल बंद करूमुंब्रा बायपास अतिशय धोकादायक झाला होता. या बायपासचे काम सुरू होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरील वसुली पक्षाचे कार्यकर्ते होऊ देणार नाही. आजचे आंदोलन करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर इशारा दिला होता. मात्र, यापुढे टोलवसुली बंद न केल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आव्हाड यांनी या वेळी दिला.