शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

मुलुंड टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:44 IST

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.

ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.मुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गत आठवड्यात हाती घेतले. हे काम साधारणत: दोन महिने चालणार आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. अतिशय रहदारीचा हा मार्ग बंद केल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. ठाणे शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा मुद्दा उचलून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी सकाळी मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, शानू पठाण, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजा राजपूरकर, अनुसूचित जाती सेलचे कैलास हावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, हेमंत वाणी, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रवी पालव, कुलदीप तिवारी, समीर भोईर यांच्यासह शहर कार्यकारिणीचे सदस्य आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली आणि आनंदनगर (मुलुंड) टोलनाक्यावरील वसुली थांबवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी मागणी पूर्ण न झाल्यास कायदा हातात घेऊन टोलनाके खुले करण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानुसार, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलन सुरू करण्यात आले. टोलवसुलीसाठी थांबवलेली वाहने या आंदोलनामुळे टोल न घेताच सोडण्यात आली. मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ऐरोली, शीळफाटामार्गे वळवण्यात आली आहे. मात्र, या पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यासाठी शासन जबाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी या वेळी केला.>पालकमंत्र्यांवर आरोपबायपास दुरुस्तीच्या कालावधीमध्ये वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी ऐरोली किंवा मुलुंडपैकी एकच टोलनाका सुरू राहील, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्यांची घोषणा हवेतच विरल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही टोल मान्य नसून बायपासचे काम सुरू होईपर्यंत येथील वसुली होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. पक्षाचे आंदोलन सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे येथून मार्गस्थ झाले. मात्र, त्यांनी आंदोलनाबाबत साधी विचारपूसही केली नाही. हे माणुसकीहीनतेचे लक्षण असल्याचा आरोपही आव्हाड यांनी या वेळी केला.>यापुढे गनिमी काव्यानेटोल बंद करूमुंब्रा बायपास अतिशय धोकादायक झाला होता. या बायपासचे काम सुरू होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरील वसुली पक्षाचे कार्यकर्ते होऊ देणार नाही. आजचे आंदोलन करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर इशारा दिला होता. मात्र, यापुढे टोलवसुली बंद न केल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आव्हाड यांनी या वेळी दिला.