शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:57 IST

शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.

भार्इंदर : शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणांतील जलसाठा कमी असल्याने त्याचे नियोजन जुलै २०१६ पर्यंत करता यावे, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून सरासरी ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आघाडी सरकारच्या काळात विशेष बाब म्हणून शहराला पाणीकपातीमधून वेळोवेळी वगळले होते. परंतु, यंदा पालिकेसह राज्यात युतीची सत्ता असतानाही पूर्णपणे पाणीकपात केली आहे. ती त्वरित रद्द करून त्याची अंमलबजावणी व्हावी, पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर शेवटच्या टोकाला असल्याने शहरांतर्गत होणारा पाणीपुरवठा ४० वरून सुमारे ७५ तासांवर गेला आहे. यामुळे अनेक भागांत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथे पाण्याची समस्या जटिल बनली आहे. काही भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी त्याचे प्रमाण सुमारे ५० टक्कयांहून कमी असल्याने पाण्याची समस्या कायम आहे. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा निश्चित प्रमाणात होतो की नाही, त्याचे मोजमाप प्रशासनाकडून होत नसल्याने पालिकेकडून अव्वाच्या सव्वा बिल भरले जात आहे. त्यातच अनेक मीटर बंदावस्थेत असल्याने सरसकट काढण्यात येणाऱ्या बिलांमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने नवीन मीटर्स बसविण्यात यावेत, पाण्याची गळती सुमारे २० टक्के इतकी असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी वाया जात असल्याने गळतीचे नियोजन करून ती पूर्णत: बंद करावी.मोर्चात माजी महापौर कॅटलिन परेरा, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, भगवती शर्मा आदींसह इतर नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)