शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:57 IST

शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.

भार्इंदर : शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणांतील जलसाठा कमी असल्याने त्याचे नियोजन जुलै २०१६ पर्यंत करता यावे, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून सरासरी ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आघाडी सरकारच्या काळात विशेष बाब म्हणून शहराला पाणीकपातीमधून वेळोवेळी वगळले होते. परंतु, यंदा पालिकेसह राज्यात युतीची सत्ता असतानाही पूर्णपणे पाणीकपात केली आहे. ती त्वरित रद्द करून त्याची अंमलबजावणी व्हावी, पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर शेवटच्या टोकाला असल्याने शहरांतर्गत होणारा पाणीपुरवठा ४० वरून सुमारे ७५ तासांवर गेला आहे. यामुळे अनेक भागांत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथे पाण्याची समस्या जटिल बनली आहे. काही भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी त्याचे प्रमाण सुमारे ५० टक्कयांहून कमी असल्याने पाण्याची समस्या कायम आहे. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा निश्चित प्रमाणात होतो की नाही, त्याचे मोजमाप प्रशासनाकडून होत नसल्याने पालिकेकडून अव्वाच्या सव्वा बिल भरले जात आहे. त्यातच अनेक मीटर बंदावस्थेत असल्याने सरसकट काढण्यात येणाऱ्या बिलांमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने नवीन मीटर्स बसविण्यात यावेत, पाण्याची गळती सुमारे २० टक्के इतकी असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी वाया जात असल्याने गळतीचे नियोजन करून ती पूर्णत: बंद करावी.मोर्चात माजी महापौर कॅटलिन परेरा, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, भगवती शर्मा आदींसह इतर नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)