शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची घोषणा

By admin | Updated: January 22, 2017 05:05 IST

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे ‘एकला चलो रे’ हेच ब्रीद असल्याचे स्पष्ट झाले. सर्वच्या सर्व ७८ जागा लढवायला निघालेला राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ओमी कलानी यांच्या जोरावर हे शिवधनुष्य उचलायला निघाला आहे, त्यांची भाजपाच्या एका गटासोबत छुपी युती करण्याकरिता नेत्रपल्लवी सुरू आहे. अर्थात, ओमी हे पक्षाचा एक भाग आहेत, असे मत खुद्द नाईक यांनी व्यक्त केले आहे.उल्हासनगरातील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गणेश नाईक, पक्षाचे निरीक्षक सुधाकर वढे, प्रमोद हिंदुराव, ओमी कलानी, ज्योती कलानी यांच्या उपस्थितीत झाल्या. सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कार्यालयात एकच गर्दी झाली होती. तब्बल २८० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी निरीक्षक सुधाकर वढे व संजीव नाईक यांच्या उपस्थितीत गोवा कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवार जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीला मुलाखतीनंतर धक्का बसणार नसल्याचे सांगून अपवादात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार ज्योती कलानी यांना दिल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. ओमी कलानी यांच्या प्रवेशाकरिता भाजपाने गळ टाकला असला, तरी ओमी हे पक्षाचाच एक भाग असून ते पक्षाच्या युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. काँग्रेस पक्षाकडून उल्हासनगरात आघाडी करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही. तसेच आम्हीही त्यांना प्रस्ताव पाठवला नसल्याने आघाडी होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले. यापुढे आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्याचा तपशील पाहून विचार करू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राष्ट्रवादी सर्वच्या सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे करून पालिकेची पूर्ण सत्ता काबीज करणार असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)भाजपासोबत छुपा समझोताउल्हासनगरात सत्ता हस्तगत करण्याकरिता भाजपासोबत हातमिळवणी करणे अपरिहार्य असल्याचे ज्योती कलानी यांचे समर्थक सांगत होते. भाजपाची ८० टक्के कार्यकारिणी ही ओमी यांच्यासोबत समझोता करण्याच्या बाजूची आहे, असे ते सांगत होते.याच गटासोबत कलानी यांच्या चर्चा सुरू असून परस्परांच्या कोणत्या जागांवर उमेदवार द्यायचे नाही किंवा कमकुवत उमेदवार द्यायचे, याच्या वाटाघाटी सुरू असून दोन दिवसांत त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.