शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची घोषणा

By admin | Updated: January 22, 2017 05:05 IST

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे ‘एकला चलो रे’ हेच ब्रीद असल्याचे स्पष्ट झाले. सर्वच्या सर्व ७८ जागा लढवायला निघालेला राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ओमी कलानी यांच्या जोरावर हे शिवधनुष्य उचलायला निघाला आहे, त्यांची भाजपाच्या एका गटासोबत छुपी युती करण्याकरिता नेत्रपल्लवी सुरू आहे. अर्थात, ओमी हे पक्षाचा एक भाग आहेत, असे मत खुद्द नाईक यांनी व्यक्त केले आहे.उल्हासनगरातील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गणेश नाईक, पक्षाचे निरीक्षक सुधाकर वढे, प्रमोद हिंदुराव, ओमी कलानी, ज्योती कलानी यांच्या उपस्थितीत झाल्या. सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कार्यालयात एकच गर्दी झाली होती. तब्बल २८० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी निरीक्षक सुधाकर वढे व संजीव नाईक यांच्या उपस्थितीत गोवा कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवार जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीला मुलाखतीनंतर धक्का बसणार नसल्याचे सांगून अपवादात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार ज्योती कलानी यांना दिल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. ओमी कलानी यांच्या प्रवेशाकरिता भाजपाने गळ टाकला असला, तरी ओमी हे पक्षाचाच एक भाग असून ते पक्षाच्या युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. काँग्रेस पक्षाकडून उल्हासनगरात आघाडी करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही. तसेच आम्हीही त्यांना प्रस्ताव पाठवला नसल्याने आघाडी होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले. यापुढे आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्याचा तपशील पाहून विचार करू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राष्ट्रवादी सर्वच्या सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे करून पालिकेची पूर्ण सत्ता काबीज करणार असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)भाजपासोबत छुपा समझोताउल्हासनगरात सत्ता हस्तगत करण्याकरिता भाजपासोबत हातमिळवणी करणे अपरिहार्य असल्याचे ज्योती कलानी यांचे समर्थक सांगत होते. भाजपाची ८० टक्के कार्यकारिणी ही ओमी यांच्यासोबत समझोता करण्याच्या बाजूची आहे, असे ते सांगत होते.याच गटासोबत कलानी यांच्या चर्चा सुरू असून परस्परांच्या कोणत्या जागांवर उमेदवार द्यायचे नाही किंवा कमकुवत उमेदवार द्यायचे, याच्या वाटाघाटी सुरू असून दोन दिवसांत त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.