शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची घोषणा

By admin | Updated: January 22, 2017 05:05 IST

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे ‘एकला चलो रे’ हेच ब्रीद असल्याचे स्पष्ट झाले. सर्वच्या सर्व ७८ जागा लढवायला निघालेला राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ओमी कलानी यांच्या जोरावर हे शिवधनुष्य उचलायला निघाला आहे, त्यांची भाजपाच्या एका गटासोबत छुपी युती करण्याकरिता नेत्रपल्लवी सुरू आहे. अर्थात, ओमी हे पक्षाचा एक भाग आहेत, असे मत खुद्द नाईक यांनी व्यक्त केले आहे.उल्हासनगरातील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गणेश नाईक, पक्षाचे निरीक्षक सुधाकर वढे, प्रमोद हिंदुराव, ओमी कलानी, ज्योती कलानी यांच्या उपस्थितीत झाल्या. सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कार्यालयात एकच गर्दी झाली होती. तब्बल २८० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी निरीक्षक सुधाकर वढे व संजीव नाईक यांच्या उपस्थितीत गोवा कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवार जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीला मुलाखतीनंतर धक्का बसणार नसल्याचे सांगून अपवादात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार ज्योती कलानी यांना दिल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. ओमी कलानी यांच्या प्रवेशाकरिता भाजपाने गळ टाकला असला, तरी ओमी हे पक्षाचाच एक भाग असून ते पक्षाच्या युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. काँग्रेस पक्षाकडून उल्हासनगरात आघाडी करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही. तसेच आम्हीही त्यांना प्रस्ताव पाठवला नसल्याने आघाडी होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले. यापुढे आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्याचा तपशील पाहून विचार करू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राष्ट्रवादी सर्वच्या सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे करून पालिकेची पूर्ण सत्ता काबीज करणार असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)भाजपासोबत छुपा समझोताउल्हासनगरात सत्ता हस्तगत करण्याकरिता भाजपासोबत हातमिळवणी करणे अपरिहार्य असल्याचे ज्योती कलानी यांचे समर्थक सांगत होते. भाजपाची ८० टक्के कार्यकारिणी ही ओमी यांच्यासोबत समझोता करण्याच्या बाजूची आहे, असे ते सांगत होते.याच गटासोबत कलानी यांच्या चर्चा सुरू असून परस्परांच्या कोणत्या जागांवर उमेदवार द्यायचे नाही किंवा कमकुवत उमेदवार द्यायचे, याच्या वाटाघाटी सुरू असून दोन दिवसांत त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.