शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

धोकादायक इमारतींबाबत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते ...

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते भारत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले तसेच निवारा केंद्र, चटईक्षेत्र आदी सुविधांची मागणी केली.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीतील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन एका समितीची नियुक्ती केली. नियुक्ती केलेली समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल देणार आहे. त्यापूर्वी धोकादायक इमारतीमधून बेघर होणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने एमएमआरडीएच्या ताब्यातील ३०० प्लॉट देण्याला शासनाने मान्यता दिली. दुसरीकडे इमारतीचा स्लॅब कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेते शासनाकडे करीत आहेत. याचाच भाग म्हणून शहर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत चर्चा करून धोकादायक इमारतीबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी साकडे घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या निवेदनावरून प्रभागातील विकासकामासाठी गेल्यावर्षी २६ कोटींचा निधी दिला. त्याप्रमाणे आताही उपमुख्यमंत्री अजित पवार शहर विकासासाठी निधीसह धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता भारत गंगोत्री यांनी बोलून दाखविली.

पक्षाच्या शहर राजकारणात माजी खासदार व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर धामी यांनी केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

------

जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढा

महापालिकेने दहा वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या असून, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शेकडो इमारती धोकादायक घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे.