शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

धोकादायक इमारतींबाबत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते ...

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते भारत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले तसेच निवारा केंद्र, चटईक्षेत्र आदी सुविधांची मागणी केली.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीतील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन एका समितीची नियुक्ती केली. नियुक्ती केलेली समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल देणार आहे. त्यापूर्वी धोकादायक इमारतीमधून बेघर होणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने एमएमआरडीएच्या ताब्यातील ३०० प्लॉट देण्याला शासनाने मान्यता दिली. दुसरीकडे इमारतीचा स्लॅब कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेते शासनाकडे करीत आहेत. याचाच भाग म्हणून शहर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत चर्चा करून धोकादायक इमारतीबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी साकडे घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या निवेदनावरून प्रभागातील विकासकामासाठी गेल्यावर्षी २६ कोटींचा निधी दिला. त्याप्रमाणे आताही उपमुख्यमंत्री अजित पवार शहर विकासासाठी निधीसह धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता भारत गंगोत्री यांनी बोलून दाखविली.

पक्षाच्या शहर राजकारणात माजी खासदार व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर धामी यांनी केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

------

जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढा

महापालिकेने दहा वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या असून, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शेकडो इमारती धोकादायक घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे.