शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

धोकादायक इमारतींबाबत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते ...

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते भारत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले तसेच निवारा केंद्र, चटईक्षेत्र आदी सुविधांची मागणी केली.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीतील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन एका समितीची नियुक्ती केली. नियुक्ती केलेली समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल देणार आहे. त्यापूर्वी धोकादायक इमारतीमधून बेघर होणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने एमएमआरडीएच्या ताब्यातील ३०० प्लॉट देण्याला शासनाने मान्यता दिली. दुसरीकडे इमारतीचा स्लॅब कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेते शासनाकडे करीत आहेत. याचाच भाग म्हणून शहर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत चर्चा करून धोकादायक इमारतीबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी साकडे घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या निवेदनावरून प्रभागातील विकासकामासाठी गेल्यावर्षी २६ कोटींचा निधी दिला. त्याप्रमाणे आताही उपमुख्यमंत्री अजित पवार शहर विकासासाठी निधीसह धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता भारत गंगोत्री यांनी बोलून दाखविली.

पक्षाच्या शहर राजकारणात माजी खासदार व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर धामी यांनी केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

------

जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढा

महापालिकेने दहा वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या असून, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शेकडो इमारती धोकादायक घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे.