शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

धोकादायक इमारतींबाबत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते ...

उल्हासनगर : शहरातील अवैध व धोकादायक इमारतीमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष हरकिरण कौर धामी, सभागृहनेते भारत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले तसेच निवारा केंद्र, चटईक्षेत्र आदी सुविधांची मागणी केली.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीतील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन एका समितीची नियुक्ती केली. नियुक्ती केलेली समिती १५ दिवसांत शासनाला अहवाल देणार आहे. त्यापूर्वी धोकादायक इमारतीमधून बेघर होणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने एमएमआरडीएच्या ताब्यातील ३०० प्लॉट देण्याला शासनाने मान्यता दिली. दुसरीकडे इमारतीचा स्लॅब कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेते शासनाकडे करीत आहेत. याचाच भाग म्हणून शहर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरातील समस्यांबाबत चर्चा करून धोकादायक इमारतीबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी साकडे घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते व महापालिका सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्या निवेदनावरून प्रभागातील विकासकामासाठी गेल्यावर्षी २६ कोटींचा निधी दिला. त्याप्रमाणे आताही उपमुख्यमंत्री अजित पवार शहर विकासासाठी निधीसह धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता भारत गंगोत्री यांनी बोलून दाखविली.

पक्षाच्या शहर राजकारणात माजी खासदार व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्षा हरकिरण कौर धामी यांनी केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

------

जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढा

महापालिकेने दहा वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या असून, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शेकडो इमारती धोकादायक घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे.