शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

हाजुरीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा रंगला सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

ठाणे : ठाण्यातील हाजुरी भागातील नागरिकांच्या सोयीसुविधा आणि विकासकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीने ...

ठाणे : ठाण्यातील हाजुरी भागातील नागरिकांच्या सोयीसुविधा आणि विकासकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीने शुक्रवारी या भागात आंदोलन केले. परंतु, हा आंदोलनाचा बार फुसका असल्याचेच पुरावे आता शिवसेनेने दिले आहेत. आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची सुरुवात मात्र या निमित्ताने सुरू झाल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी शुक्रवारी हाजुरीत विविध समस्या सोडविण्यासाठी आंदोलन केले होते. जिलानी वाडीत रस्ता रुंंदीकरणात बाधितांचे पुनर्वसन करावे, उर्दू स्कूलच्या मैदानावर उभारण्यात येत असलेल्या डाटा सेंटरच्या इमारतीच्या बांधकामामुळे शाळेचे मैदान बाधित झाले असून ते अद्यापही पूर्ववत केले नाही आणि हजुरीत दर पावसाळ्यात नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरते यावर उपाय म्हणून परिसरात पर्यायी नाले तयार करावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या.

परंतु, आंदोलनकर्त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे असल्याचा दावा शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी केला आहे. हाजुरी शाळेसमोर कोणत्याही स्वरूपाचे मैदान नव्हते, तसेच रस्ता रुंदीकरणात बाधितांना घरे दिलेली आहेत. त्यातही ४५ फुटी रस्ता हा ६० फुटी करण्यासंदर्भातील ठरावदेखील झालेला आहे. मात्र, पावसामुळे हे काम थांबले असून ते लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनाचा हेतू काय होता असा सवालही आता उपस्थित झाला आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा एक स्टंट असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु, यानिमित्ताने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पुन्हा रंगल्याचे दिसून आले.