शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

युतीविरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By admin | Updated: October 30, 2015 23:42 IST

महागाईत केवळ महिलाच नाही तर शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक भरडले जात असून जीवनावश्यक वस्तूंची साठमारी करणारे व्यापारी भाजपा-सेनेचे दलाल असल्याचा आरोप केला

पालघर : महागाईत केवळ महिलाच नाही तर शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक भरडले जात असून जीवनावश्यक वस्तूंची साठमारी करणारे व्यापारी भाजपा-सेनेचे दलाल असल्याचा आरोप केला. निवडणुकीत संपवलेले पैसे या साठमारीच्या व्यवहारातून वसुली केली जात असल्याचे सांगून पालघर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून पालघर तहसीलदार कार्यालयावर शुक्रवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सत्तेवर येऊन भाजपा-सेना युती सरकारला एक वर्षाचा कालावधी लोटला असूनही जीवनावश्यक वस्तूंमधील डाळी, कडधान्ये, भाजीपाला, खाद्यतेल यांच्या किमतींत बेसुमार वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसांत भाव कमी होणे गरजेचे असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्याची पावले राज्य शासनाकडून उचलली जात नसल्याचे राष्ट्रवादीने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी सांगून पंतप्रधान हे देशात कमी तर परदेशातच जास्त फिरत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी त्यांना काही देणेघेणे नसल्याची टीका त्यांनी केली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दामोदर पाटील, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष नीलम राऊत, अशोक अंबुरे, नगरसेवक प्रीतम राऊत, फरिद लुलानिया, सचिन पाटील, अस्लम मणियार, मकरंद पाटील इ.नी भाजपा-सेना सरकारविरोधात घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला. या वेळी पालघर रेल्वे स्टेशनकडून निघालेला मोर्चा पालघर तहसीलदार कार्यालयाकडे आल्यानंतर तहसीलदार चंद्रसेन पवारांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)१वर्षपूर्तीनंतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने जव्हारमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस सरकारच्या विरुद्ध वर्ष होऊनही शेकडो समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे यशवंतनगर टॉवरपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून निदर्शने केली. या वेळी पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, नगराध्यक्ष संदीप वैद्य, माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, तालुकाध्यक्ष कमळाकर धूम, जिल्हा चिटणीस बळवंत गावित, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष शोएब लुलानिया, जिल्हा सरचिटणीस मनोहर भानुशाली, नगरसेवक संजय वांगड, मनीषा वाणी, दीपक कांगणे, हबीब शेख तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.२गेल्या वर्षभरात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याबरोबर दुष्काळाच्या संकटावरही मात करण्यात तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत सरकारने कोणतीहीठोस पावले उचलली नाहीत. नागरिकांच्या रोजच्या जगण्याला जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आकाशाला भिडली असून त्यांचे अंदाजपत्रक पूर्णत: मोडून पडले आहे, अशा विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शनिवारी वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. खंडेश्वरी नाका येथून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर, तहसीलदारांना निवेदन देण्यात येईल, असे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी सांगितले.