शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने

By admin | Updated: November 22, 2015 02:50 IST

कळवा पूर्व परिसरात वाघोबानगर येथे नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आले. या भागात पाण्याचे राजकारण

ठाणे : कळवा पूर्व परिसरात वाघोबानगर येथे नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आले. या भागात पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केल्याने उपमहापौरांनी थेट डायसवरून खाली येऊन हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर, पाण्याचे राजकारण कोण करतो आहे, हे शिकविण्याची आम्हाला गरज नसल्याचा प्रतिहल्ला थेट महापौरांनी राष्ट्रवादीवर केला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच गोंधळात महापौरांनी पुन्हा एकदा उर्वरित किचकट विषय कोणतीही चर्चा न करता मंजूर करून घेतले. कळवा पूर्व येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रीटा यादव यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत झाल्याचा मुद्दा शनिवारच्या महासभेत मांडला. या वेळी त्यांनी कळवा पूर्व येथील वाघोबानगरबरोबर आजूबाजूच्या परिसरात पाण्याची कशी वानवा आहे, याचा ऊहापोह केला. तर, अपर्णा साळवी यांनीदेखील सलग दोन दिवसांच्या शटडाऊनमुळे कळवावासीयांचे पाण्यासाठी हाल सुरू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. याच वेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनी येथे शिवसेनेच्या प्रभागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी असते, परंतु दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या प्रभागात पाणी गायब होत आहे. येथे असलेला वॉलमन हे कृत्य करीत असून, येथे पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी थेट उपमहापौर राजेंद्र साप्ते आणि शिवसेनेलाच टार्गेट केल्याने उपमहापौरांनी डायसवरून खाली उतरून सदस्यांमध्ये येऊन याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकशाही आघाडीचे नगरसेवक या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याने महापौर संजय मोरे यांनी राजकारण कोण करते आहे, हे आम्हाला चांगले माहीत असून, उगाच आम्हाला बोलायला लावू नका, असा प्रतिहल्ला केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांचा निषेध करून सभागृह उचलून धरले. अखेर, महापौरांनी या गोंधळातच पटलावर असलेले इतर सर्वच विषय कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर करून घेतले.