शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

पाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने

By admin | Updated: November 22, 2015 02:50 IST

कळवा पूर्व परिसरात वाघोबानगर येथे नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आले. या भागात पाण्याचे राजकारण

ठाणे : कळवा पूर्व परिसरात वाघोबानगर येथे नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आले. या भागात पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केल्याने उपमहापौरांनी थेट डायसवरून खाली येऊन हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर, पाण्याचे राजकारण कोण करतो आहे, हे शिकविण्याची आम्हाला गरज नसल्याचा प्रतिहल्ला थेट महापौरांनी राष्ट्रवादीवर केला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच गोंधळात महापौरांनी पुन्हा एकदा उर्वरित किचकट विषय कोणतीही चर्चा न करता मंजूर करून घेतले. कळवा पूर्व येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रीटा यादव यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत झाल्याचा मुद्दा शनिवारच्या महासभेत मांडला. या वेळी त्यांनी कळवा पूर्व येथील वाघोबानगरबरोबर आजूबाजूच्या परिसरात पाण्याची कशी वानवा आहे, याचा ऊहापोह केला. तर, अपर्णा साळवी यांनीदेखील सलग दोन दिवसांच्या शटडाऊनमुळे कळवावासीयांचे पाण्यासाठी हाल सुरू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. याच वेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनी येथे शिवसेनेच्या प्रभागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी असते, परंतु दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या प्रभागात पाणी गायब होत आहे. येथे असलेला वॉलमन हे कृत्य करीत असून, येथे पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी थेट उपमहापौर राजेंद्र साप्ते आणि शिवसेनेलाच टार्गेट केल्याने उपमहापौरांनी डायसवरून खाली उतरून सदस्यांमध्ये येऊन याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकशाही आघाडीचे नगरसेवक या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याने महापौर संजय मोरे यांनी राजकारण कोण करते आहे, हे आम्हाला चांगले माहीत असून, उगाच आम्हाला बोलायला लावू नका, असा प्रतिहल्ला केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांचा निषेध करून सभागृह उचलून धरले. अखेर, महापौरांनी या गोंधळातच पटलावर असलेले इतर सर्वच विषय कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर करून घेतले.