शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पोषण आहारवाटपात नाईक फाउंडेशनचा घोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:10 IST

जि.प. सदस्यांच्या तक्रारी : भिवंडी तालुक्यातील भ्रष्टाचार शिगेला

सुरेश लोखंडेठाणे : शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये घोळ होत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केल्या. भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना नाईक फाउंडेशनकडून पोषण आहारवाटपात घोळ केला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचे सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन सर्वसाधारण सभेत चांगलेच धारेवर धरले.जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार दिला जात आहे. त्यात ठिकठिकाणी कमीअधिक प्रमाणात संबंधित ठेकेदारांकडून घोळ केला जात असल्याचे या आधीदेखील सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले आहे. त्यातील भ्रष्टाचार नियंत्रणास आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच भिवंडी तालुक्यातील शाळांमध्ये वाटप होणाºया पोषण आहारातही भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचे सदस्यांनी निदर्शनात आणून त्यावर या सोमवारच्या बैठकीत जोरदार चर्चा घडवून आली. या आहारवाटपात नाईक फाउंडेशनकडून फसवणूक केली जात आहे, तरीदेखील प्रशासनाकडून त्यांच्या बिलांची रक्कम काढून दिली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सदस्यांनी सभागृहात केला.

नाईक फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना बंद पाकिटांमध्ये पोषण आहारवाटप केले जाते. वर्गातील उपस्थित विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्येक दिवशी नोंद घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसारच पोषण आहारबिलाची रक्कम संबंधित नाईक फाउंडेशनला देणे अपेक्षित आहे. पण, उपस्थित विद्यार्थीसंख्येऐवजी भिवंडी तालुक्यातील सर्व शाळांमधील एकूण विद्यार्थी पटसंख्येवर पोषण आहारच्या बिलाची रक्कम अदा केली जात असल्याची गंभीर बाब सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. या आरोपास अनुसरून नाईक फाउंडेशनच्या बिलांची रक्कम अदा केली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.अधीक्षकांकडून मागवला अहवालया नाईक फाउंडेशनची तक्रार प्राप्त होताच भिवंडीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अधीक्षकांकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर सादर करण्यात येत असलेल्या देयकांच्या पत्रकाची सुधारित पूर्तता करण्यासाठी फाउंडेशनला चौकशी पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या बिलांची रक्कमही थांबवण्यात आल्याचे पोषण आहारवाटप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अन्य तालुक्यांप्रमाणेच भिवंडी तालुक्यात पोषण आहारवाटपासाठी बचत गट पुढे आल्यास त्यांना काम देण्यात येईल. नाईक फाउंडेशनकडून ते काम काढून घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्पष्ट करून या पोषण आहार भ्रष्टाचार प्रकरणावरील चर्चेस थांबवण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी