शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पोषण आहारवाटपात नाईक फाउंडेशनचा घोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:10 IST

जि.प. सदस्यांच्या तक्रारी : भिवंडी तालुक्यातील भ्रष्टाचार शिगेला

सुरेश लोखंडेठाणे : शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये घोळ होत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केल्या. भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना नाईक फाउंडेशनकडून पोषण आहारवाटपात घोळ केला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचे सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन सर्वसाधारण सभेत चांगलेच धारेवर धरले.जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार दिला जात आहे. त्यात ठिकठिकाणी कमीअधिक प्रमाणात संबंधित ठेकेदारांकडून घोळ केला जात असल्याचे या आधीदेखील सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले आहे. त्यातील भ्रष्टाचार नियंत्रणास आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच भिवंडी तालुक्यातील शाळांमध्ये वाटप होणाºया पोषण आहारातही भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचे सदस्यांनी निदर्शनात आणून त्यावर या सोमवारच्या बैठकीत जोरदार चर्चा घडवून आली. या आहारवाटपात नाईक फाउंडेशनकडून फसवणूक केली जात आहे, तरीदेखील प्रशासनाकडून त्यांच्या बिलांची रक्कम काढून दिली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सदस्यांनी सभागृहात केला.

नाईक फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना बंद पाकिटांमध्ये पोषण आहारवाटप केले जाते. वर्गातील उपस्थित विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्येक दिवशी नोंद घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसारच पोषण आहारबिलाची रक्कम संबंधित नाईक फाउंडेशनला देणे अपेक्षित आहे. पण, उपस्थित विद्यार्थीसंख्येऐवजी भिवंडी तालुक्यातील सर्व शाळांमधील एकूण विद्यार्थी पटसंख्येवर पोषण आहारच्या बिलाची रक्कम अदा केली जात असल्याची गंभीर बाब सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. या आरोपास अनुसरून नाईक फाउंडेशनच्या बिलांची रक्कम अदा केली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.अधीक्षकांकडून मागवला अहवालया नाईक फाउंडेशनची तक्रार प्राप्त होताच भिवंडीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अधीक्षकांकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर सादर करण्यात येत असलेल्या देयकांच्या पत्रकाची सुधारित पूर्तता करण्यासाठी फाउंडेशनला चौकशी पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या बिलांची रक्कमही थांबवण्यात आल्याचे पोषण आहारवाटप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अन्य तालुक्यांप्रमाणेच भिवंडी तालुक्यात पोषण आहारवाटपासाठी बचत गट पुढे आल्यास त्यांना काम देण्यात येईल. नाईक फाउंडेशनकडून ते काम काढून घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्पष्ट करून या पोषण आहार भ्रष्टाचार प्रकरणावरील चर्चेस थांबवण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी