शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सर्वत्र नवरात्रीची धूम दीड हजार मूर्तींचे आगमन

By admin | Updated: October 13, 2015 02:00 IST

आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ठाणे : आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमध्ये नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी रासगरबा-दांडियाही रंगणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ हजार ४५४ दुर्गादेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना तर सुमारे १ हजार ९०० घटांची स्थापना करण्यात येणार आहेत. ठाणे शहरात सार्वजनिक स्वरूपाच्या १४४ तर घरगुती स्वरूपाच्या १९० मूर्ती आणि सार्वजनिक स्वरूपाचे १० आणि घरगुती ५२१ घट स्थापन करण्यात येणार आहेत. कल्याणमध्ये ७९ सार्वजनिक अन् २२८ घरगुती मूर्ती तर ६ सार्वजनिक आणि ९ घरगुती घटांची; उल्हासनगरात १३३ सार्वजनिक आणि १६३ घरगुती मूर्ती तर १७ सार्वजनिक आणि ३२३ घरगुती घट; अंबरनाथमध्ये सार्वजनिक १३३ मूर्ती, ११४ घरगुती मूर्ती तर ९ सार्वजनिक, ३० घरगुती घट स्थापन करण्यात येणार आहेत. तर, वागळे परिमंडळामध्ये १५१ सार्वजनिक, १४९ खासगी मूर्ती तर १४ सार्वजनिक आणि ९६२ खासगी घट प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत. दरम्यान, ठाणे शहरात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ठाणे पोलीस कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला गेले होते. त्यामुळे इंडो-तिबेटीयन पोलिसांना पाचारण केले होते. या वेळी हे सर्व पोलीस ठाण्यात परतले असल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नसला तरी राज्य राखीव पोलीस दल (एसआरपी) आणि होमगार्डच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि आगरी, कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरी, कालिका आणि रेणुका मातेच्या नवरात्र उत्सव १३ पासून साजरा होणार आहे. मात्र राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सदर उत्सवावर जास्त खर्च न करता साधेपणाने करण्याचे देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे.या उत्सवात ठाणे जिल्ह्याबरोबर मुंबई, नाशिक, रायगड आणि शेजारील गुजरात राज्यातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. या उत्सवात मंगळवारी घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे आणि नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम होणार असून विजयादशमीला देवीचे खास आकर्षण असलेला पालखी सोहळा संपन्न होणार आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मंदिरावरील जास्तीची रोषणाई, फुलांची आरास, किर्तने अशा प्रकारचा खर्च न करता सदर उत्सव साधेपणाने करण्यात येणार असल्याचा देवस्थान समितीने निर्णय घेऊन एक लाखांचा धनादेश दुष्काळ निवारण फंडासाठी मंदिर समितीने दिला.नवरात्र उत्सवास उद्यापासून प्रारंभ होत असून उद्या मध्यान्हापर्यंत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. बी पेरल्यानंतर नवव्या दिवशी अंकुर फुटतो. गर्भधारणा झाल्यावर ९ महिने ९ दिवसांनी प्रसूती होते. असा हा ९चा महिमा आहे.नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असून ती ९ दिवस करायला सांगितली असल्याचे सोमण यांनी सांगितले. या दिवसांत शेतात तयार झालेले धान्य घरी येते. पूर्वी लोक क्षेत्रपूजा करून सीमोल्लंघन करत असत. आज अज्ञान, आळस, अनीती, भ्रष्टाचार यातून सीमोल्लंघन करण्याची गरज आहे. यंदा राज्याचा बराच भाग अवर्षणग्रस्त असल्यामुळे शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.