शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

ठाण्यात सर्वत्र नवरात्रीची धूम दीड हजार मूर्तींचे आगमन

By admin | Updated: October 13, 2015 02:00 IST

आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ठाणे : आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमध्ये नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी रासगरबा-दांडियाही रंगणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ हजार ४५४ दुर्गादेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना तर सुमारे १ हजार ९०० घटांची स्थापना करण्यात येणार आहेत. ठाणे शहरात सार्वजनिक स्वरूपाच्या १४४ तर घरगुती स्वरूपाच्या १९० मूर्ती आणि सार्वजनिक स्वरूपाचे १० आणि घरगुती ५२१ घट स्थापन करण्यात येणार आहेत. कल्याणमध्ये ७९ सार्वजनिक अन् २२८ घरगुती मूर्ती तर ६ सार्वजनिक आणि ९ घरगुती घटांची; उल्हासनगरात १३३ सार्वजनिक आणि १६३ घरगुती मूर्ती तर १७ सार्वजनिक आणि ३२३ घरगुती घट; अंबरनाथमध्ये सार्वजनिक १३३ मूर्ती, ११४ घरगुती मूर्ती तर ९ सार्वजनिक, ३० घरगुती घट स्थापन करण्यात येणार आहेत. तर, वागळे परिमंडळामध्ये १५१ सार्वजनिक, १४९ खासगी मूर्ती तर १४ सार्वजनिक आणि ९६२ खासगी घट प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत. दरम्यान, ठाणे शहरात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ठाणे पोलीस कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला गेले होते. त्यामुळे इंडो-तिबेटीयन पोलिसांना पाचारण केले होते. या वेळी हे सर्व पोलीस ठाण्यात परतले असल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नसला तरी राज्य राखीव पोलीस दल (एसआरपी) आणि होमगार्डच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि आगरी, कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरी, कालिका आणि रेणुका मातेच्या नवरात्र उत्सव १३ पासून साजरा होणार आहे. मात्र राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सदर उत्सवावर जास्त खर्च न करता साधेपणाने करण्याचे देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे.या उत्सवात ठाणे जिल्ह्याबरोबर मुंबई, नाशिक, रायगड आणि शेजारील गुजरात राज्यातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. या उत्सवात मंगळवारी घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे आणि नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम होणार असून विजयादशमीला देवीचे खास आकर्षण असलेला पालखी सोहळा संपन्न होणार आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मंदिरावरील जास्तीची रोषणाई, फुलांची आरास, किर्तने अशा प्रकारचा खर्च न करता सदर उत्सव साधेपणाने करण्यात येणार असल्याचा देवस्थान समितीने निर्णय घेऊन एक लाखांचा धनादेश दुष्काळ निवारण फंडासाठी मंदिर समितीने दिला.नवरात्र उत्सवास उद्यापासून प्रारंभ होत असून उद्या मध्यान्हापर्यंत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. बी पेरल्यानंतर नवव्या दिवशी अंकुर फुटतो. गर्भधारणा झाल्यावर ९ महिने ९ दिवसांनी प्रसूती होते. असा हा ९चा महिमा आहे.नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असून ती ९ दिवस करायला सांगितली असल्याचे सोमण यांनी सांगितले. या दिवसांत शेतात तयार झालेले धान्य घरी येते. पूर्वी लोक क्षेत्रपूजा करून सीमोल्लंघन करत असत. आज अज्ञान, आळस, अनीती, भ्रष्टाचार यातून सीमोल्लंघन करण्याची गरज आहे. यंदा राज्याचा बराच भाग अवर्षणग्रस्त असल्यामुळे शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.