शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:28 IST

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

- नारायण जाधव ठाणे : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. यात मेट्रोसह सीएसटी ते पनवेल उन्नत उपनगरीय मार्गासह जलवाहतुकीचा समावेश आहे. यात जलवाहतुकीच्या मार्गात असलेला खारफुटीचा मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. कारण, करावे आणि शहाबाज येथील सुमारे ०.४६ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनखात्याने मान्यता दिली आहे. यामुळे आता केवळ कांदळवन कक्षाची परवानगी मिळताच नेरूळ आणि बेलापूर येथे जेट्टी बांधण्याचा सिडको आणि मेरिटाइम बोर्डाचा मार्ग मोकळा होणार आहे.महसूल आणि वनखात्याने ठाणे जिल्ह्यातील करावे येथील सर्व्हे क्रमांक २६१ अ व ३०६ वरील राखीव वनांची ०.४४ हेक्टर आणि शहाबाज येथील सर्व्हे क्रमांक ५०० वरील कांदळवनाची ०.०२ हेक्टर जमीन सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे जेट्टी बांधण्यासाठी वळती केली आहे. यानुसार, प्रकल्प यंत्रणा अर्थात सिडको आणि मेरिटाइम बोर्डाने नागपूर येथील अपर प्रधान वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्रातील अटी व शर्तींचे पालन करून जेट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात करायची आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारत सरकारच्या २५ सप्टेंबर २०१७ आणि १३ फेबु्रवारी २०१८ च्या पत्रातील नियमांनुसार ते करावे, कांदळवन कक्षाच्या प्रमुखांनी त्यांची खात्री करावी, असेही अपर मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आपल्या पत्रात सिडकोस बजावले आहे.>सिडकोचा सुटकेचा नि:श्वासमुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडायचे की, सायन-पनवेल हायवेचे रुंदीकरण करून जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका,न्हावा-शिवडी सी-लिंकची उभारणी करून लवकरात लवकरप्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्याचे उपाय शोधले असतानासर्वांत स्वस्त, कमी खर्चीक व जलद असा हा जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे.सध्या नवी मुंबई ते मुंबईदरम्यान असलेली रस्तेवाहतूक दिवसेंदिवस तापदायक ठरत आहे. रेल्वेवरही ताण पडत आहे. परंतु आज-उद्या सुरू होणार, असे म्हणत गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक कधी सुरू होणार, असा प्रश्न सिडकोस पडला होता. परंतु, आता खारफुटीची जमीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.