शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:28 IST

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

- नारायण जाधव ठाणे : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. यात मेट्रोसह सीएसटी ते पनवेल उन्नत उपनगरीय मार्गासह जलवाहतुकीचा समावेश आहे. यात जलवाहतुकीच्या मार्गात असलेला खारफुटीचा मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. कारण, करावे आणि शहाबाज येथील सुमारे ०.४६ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनखात्याने मान्यता दिली आहे. यामुळे आता केवळ कांदळवन कक्षाची परवानगी मिळताच नेरूळ आणि बेलापूर येथे जेट्टी बांधण्याचा सिडको आणि मेरिटाइम बोर्डाचा मार्ग मोकळा होणार आहे.महसूल आणि वनखात्याने ठाणे जिल्ह्यातील करावे येथील सर्व्हे क्रमांक २६१ अ व ३०६ वरील राखीव वनांची ०.४४ हेक्टर आणि शहाबाज येथील सर्व्हे क्रमांक ५०० वरील कांदळवनाची ०.०२ हेक्टर जमीन सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे जेट्टी बांधण्यासाठी वळती केली आहे. यानुसार, प्रकल्प यंत्रणा अर्थात सिडको आणि मेरिटाइम बोर्डाने नागपूर येथील अपर प्रधान वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्रातील अटी व शर्तींचे पालन करून जेट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात करायची आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारत सरकारच्या २५ सप्टेंबर २०१७ आणि १३ फेबु्रवारी २०१८ च्या पत्रातील नियमांनुसार ते करावे, कांदळवन कक्षाच्या प्रमुखांनी त्यांची खात्री करावी, असेही अपर मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आपल्या पत्रात सिडकोस बजावले आहे.>सिडकोचा सुटकेचा नि:श्वासमुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडायचे की, सायन-पनवेल हायवेचे रुंदीकरण करून जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका,न्हावा-शिवडी सी-लिंकची उभारणी करून लवकरात लवकरप्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्याचे उपाय शोधले असतानासर्वांत स्वस्त, कमी खर्चीक व जलद असा हा जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे.सध्या नवी मुंबई ते मुंबईदरम्यान असलेली रस्तेवाहतूक दिवसेंदिवस तापदायक ठरत आहे. रेल्वेवरही ताण पडत आहे. परंतु आज-उद्या सुरू होणार, असे म्हणत गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक कधी सुरू होणार, असा प्रश्न सिडकोस पडला होता. परंतु, आता खारफुटीची जमीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.