शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 06:28 IST

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

- नारायण जाधव ठाणे : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. यात मेट्रोसह सीएसटी ते पनवेल उन्नत उपनगरीय मार्गासह जलवाहतुकीचा समावेश आहे. यात जलवाहतुकीच्या मार्गात असलेला खारफुटीचा मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. कारण, करावे आणि शहाबाज येथील सुमारे ०.४६ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनखात्याने मान्यता दिली आहे. यामुळे आता केवळ कांदळवन कक्षाची परवानगी मिळताच नेरूळ आणि बेलापूर येथे जेट्टी बांधण्याचा सिडको आणि मेरिटाइम बोर्डाचा मार्ग मोकळा होणार आहे.महसूल आणि वनखात्याने ठाणे जिल्ह्यातील करावे येथील सर्व्हे क्रमांक २६१ अ व ३०६ वरील राखीव वनांची ०.४४ हेक्टर आणि शहाबाज येथील सर्व्हे क्रमांक ५०० वरील कांदळवनाची ०.०२ हेक्टर जमीन सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे जेट्टी बांधण्यासाठी वळती केली आहे. यानुसार, प्रकल्प यंत्रणा अर्थात सिडको आणि मेरिटाइम बोर्डाने नागपूर येथील अपर प्रधान वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्रातील अटी व शर्तींचे पालन करून जेट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात करायची आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारत सरकारच्या २५ सप्टेंबर २०१७ आणि १३ फेबु्रवारी २०१८ च्या पत्रातील नियमांनुसार ते करावे, कांदळवन कक्षाच्या प्रमुखांनी त्यांची खात्री करावी, असेही अपर मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आपल्या पत्रात सिडकोस बजावले आहे.>सिडकोचा सुटकेचा नि:श्वासमुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडायचे की, सायन-पनवेल हायवेचे रुंदीकरण करून जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका,न्हावा-शिवडी सी-लिंकची उभारणी करून लवकरात लवकरप्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्याचे उपाय शोधले असतानासर्वांत स्वस्त, कमी खर्चीक व जलद असा हा जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे.सध्या नवी मुंबई ते मुंबईदरम्यान असलेली रस्तेवाहतूक दिवसेंदिवस तापदायक ठरत आहे. रेल्वेवरही ताण पडत आहे. परंतु आज-उद्या सुरू होणार, असे म्हणत गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक कधी सुरू होणार, असा प्रश्न सिडकोस पडला होता. परंतु, आता खारफुटीची जमीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.