शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नाट्यसंमेलनाला ठेंगा अन शिवसेनेशी पंगा

By admin | Updated: February 23, 2016 02:24 IST

विदेशी शिष्टमंडळासोबत बैठक असल्याचे सांगत नाट्यसंमेलनातून लवकर काढता पाय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे मोजके पदाधिकारी सोबत घेत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे : विदेशी शिष्टमंडळासोबत बैठक असल्याचे सांगत नाट्यसंमेलनातून लवकर काढता पाय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे मोजके पदाधिकारी सोबत घेत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत जवळपास दीड तास खलबते केल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या वेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग असल्याने विरोधकांची नेमकी कोणती प्रकरणे बाहेर काढली जातात किंवा त्यांच्या कोणत्या प्रकरणांवर अधिक लक्ष दिले जाते, या चर्चेला उधाण आले आहे. पुढच्या वर्षी होणारी पालिकेची निवडणूक, परमार प्रकरणाचा तपास, बाळाराम म्हात्रे खून प्रकरणाला २५ वर्षांनी फुटलेली वाचा, शहरातील वेगवेगळे प्रश्न, मंजुरीच्या प्रतीक्षेतील अर्थसंकल्प, स्मार्ट ठाण्याचे आश्वासन असे अनेक मुद्दे सध्या तेजीत असतानाच खुद्द आयुक्तांसोबत खलबते झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. परिणामी, मुख्यमंत्र्यांनी थाप मारत, शिवसेनेसह नाट्यरसिकांना अंधारात ठेवत पालिका आणि पोलीस आयुक्तांकडून ठाणे काबीज करण्यासाठी बरीच माहिती गोळा केल्याची चर्चा दिवसभर रंगली. नाट्यसंमेलनाच्या समारोपावेळी विदेशी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याने कार्यक्रम घाईत उरकण्यात आला. मेक इन महाराष्ट्रची एखादी बैठक असेल, असे गृहीत धरून संमेलनाचे आयोजक असलेल्या शिवसेनेनेही ती बाब फारशी मनावर घेतली नाही. पण, भाजपाचे पदाधिकारी, पोलीस आयुक्तांसोबत ते पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेल्याचे कळताच कलारजनीच्या वेळी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांत प्रचंड अस्वस्थता पसरली. संमेलनाच्या व्यासपीठावर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना मेट्रोची प्रतिकृती भेट दिली आणि हा प्रकल्प लवकर मार्गी लावावा, असे सुचवले. त्यावर, चार वर्षांत मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून वेळ मारून नेली. शिवसेनेच्या नेत्यांनी मेट्रोच्या प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेण्यासाठी ही खेळी खेळल्याचे मानले जाते. पुढील कार्यक्र माला जायचे असल्याने सत्कार सोहळ्याची, भाषणांची संख्या कमी करण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेचेच अन्य नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यांना फारशा मागण्या मांडता आल्याच नाहीत. त्यानंतर, मुंबईला निघालेले मुख्यमंत्री भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत थेट आयुक्तांच्या बंगल्यावर पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक मैत्री जपल्याचे भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना खाजगीत सांगितले.