शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: March 26, 2017 04:22 IST

मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीच्या वाताहतीला सुरुवात झाली असली, तरी त्याला रविवारी खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी

राजू काळे / भार्इंदरमीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीच्या वाताहतीला सुरुवात झाली असली, तरी त्याला रविवारी खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांसह काही नगरसेवक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ते खरे ठरले आहे.शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाअभावी भरकटला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपाने त्यातील अचूक प्यादे आपल्या पटावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडेच राष्ट्रवादीच्या अनिता पाटील व वंदना पाटील या दोन नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ध्रुवकिशोर पाटील व सुरेश खंडेलवाल हे भाजपात जाणार असल्याचे वृत्त ‘मॅरेथॉनच्या आडून प्रवेशाची तयारी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. तसेच जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना हसनाळे-शिंदे, नगरसेवक रवींद्र माळी हे सुद्धा भाजपात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. यातील ध्रुवकिशोर व मोहन पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. सध्या ते गणेश नाईक गटाचे समर्थक मानले जातात. मोहन यांना पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवणक तसेच त्यांच्या शाळेतील काही वाद मिटवण्यासाठी त्यांनी कमळ हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे. ध्रुवकिशोर व खंडेलवाल या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात अमराठी राहत असल्याने ‘सबका साथ सब का विकास’च्या कमळात विराजमान होणे पसंत केले आहे. ज्योत्स्ना, खंडेलवाल हे गिल्बर्ट मेंडोन्सा गटाचे मानले जातात. मेंडोन्सा यांनी ज्योत्स्ना यांना २००४-०५ मध्ये महापौरपदी विराजमान करण्यासाठी पक्षातील त्यावेळच्या महापौर निर्मला सावळे यांना पक्षातून काढले. त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पदे देऊनही केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक रवींद्र माळी यांनी सुरुवातीला शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तडजोडीत भाजपा सरस ठरले. राष्ट्रवादीचे नगरसेवक परशुराम म्हात्रेही भाजपात जाणार आहेत. राष्ट्रवादीचे हे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी रविवारी भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे आतापासूनच मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात होणार हे स्पष्ट झाले आहे.

ज्यांना स्थानिक नेतृत्वाने मोठे केले, त्यांनी तरी किमान पक्षांतर करणे बरोबर नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ स्वार्थासाठी पक्षांतर केले जात आहे. -बर्नड डिमेलो, गटनेते, राष्ट्रवादी

भाजपात सध्या इच्छुकांची मांदियाळी सुरू आहे. निवडणुकीच्यावेळी इच्छुकांना उमेदवारी देताना पक्षाची दमछाक होणार आहे. त्यावेळी मात्र पक्षातील आयारामांवर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार आहे.- प्रकाश नागणे, प्रवक्ते