शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी राष्ट्रीय  लोक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:54 IST

ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी

ठळक मुद्देराष्ट्रीय लोक लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्येप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज

ठाणे : जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र असलेले खटल्यांवर सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधी ९ मार्च रोजी होणारे हे लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार आहे. याचा लाभ मोठ्यासंख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करण्याचे आवाहन सर्व पक्षकारांना करण्यात आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम आर देशपांडे यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना कोणतीही समस्या असेल व इतर चौकशी करायची असल्यास त्यांनी वाशी, नवी मुंबई, भिवंडी , कल्याण, मुरबाड , शहापूर, उल्हासनगर, पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार आदी ठिकाणच्या न्यायालयातील विधी सेवा समिती कार्यालयाशी संपर्क साधवा. या शिवाय काय समस्या व लोक न्यायालयाशी संबंधीत काही माहिती हवी असल्याच पक्षकारांनी येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येऊन किंवा २२-२५४७६४४१ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय