शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीसाठी राष्ट्रीय  लोक न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:54 IST

ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी

ठळक मुद्देराष्ट्रीय लोक लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्येप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज

ठाणे : जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र असलेले खटल्यांवर सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या आधी ९ मार्च रोजी होणारे हे लोकन्यायालय आता १७ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार आहे. याचा लाभ मोठ्यासंख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ठाणे व पालघरमधील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार आणि सहकार न्यायालये यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे कामकाज १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, १३८ एन. आय. अ‍ॅक्ट(चेक संबधित) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक वाद, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांचेकडे अर्ज करण्याचे आवाहन सर्व पक्षकारांना करण्यात आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम आर देशपांडे यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील सर्व पक्षकारांना कोणतीही समस्या असेल व इतर चौकशी करायची असल्यास त्यांनी वाशी, नवी मुंबई, भिवंडी , कल्याण, मुरबाड , शहापूर, उल्हासनगर, पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार आदी ठिकाणच्या न्यायालयातील विधी सेवा समिती कार्यालयाशी संपर्क साधवा. या शिवाय काय समस्या व लोक न्यायालयाशी संबंधीत काही माहिती हवी असल्याच पक्षकारांनी येथील जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येऊन किंवा २२-२५४७६४४१ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय