शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ हिला उपविभागीय अधिकारी यांनी दिली तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 19:31 IST

- नितिन पंडीत भिवंडी : शहापूर तालुक्यातील हाली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्या नंतर ही अठराविश्व दारिद्र्य व ...

- नितिन पंडीत

भिवंडी: शहापूर तालुक्यातील हाली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्या नंतर ही अठराविश्व दारिद्र्य व अंधार काही संपला नव्हता. लॉकडाऊन मुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत मिळालेली नोकरी आश्रमशाळा बंद असल्याने तीही बंद झाली. तर शिधावाटप पत्रिकेची ऑनलाईन नोंद नसल्याने तीन महिने धान्य सुध्दा न मिळाल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्याने त्याची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी घेत तीस तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर तिची नियुक्ती करण्यात आली असून  बुधवारी हली बरफ हिस भिवंडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावून नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला. त्यासोबतच पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधा पत्रिकेची ऑनलाईन नोंदणी होत नाही तोपर्यंत तिला ऑफलाईन धान्य देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिले आहेत .

कातकरी या आदिम आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील हाली बरफ हिने १२ वर्षांची असताना जंगलात लाकूडफाटा घेण्यासाठी गेली असता वाघाने केलेल्या हल्ल्यातून आपल्या बहिणीचे प्राण वाचविले होते त्याचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर २०१२ मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन करण्यात आला होता . परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हाली कडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले .त्यातून तिला अंत्योदय शिधापत्रिका , घरकुल देण्यात आले तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती .

परंतु लॉकडाऊन मध्ये आश्रमशाळा मागील एक वर्षांपासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दारिद्र्याचे जीवन जगण्याची वेळ आली होती यावर उपाय म्हणून ही तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हाली बरफ हिने समाधान व्यक्त केले आहे .समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून हाली बरफ हिच्या वाट्याला आलेल्या आयुष्याची माहिती कळताच आपण तिला हंगामी नोकरी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे .

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे