शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

भार्इंदरच्या मंडईतून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 05:35 IST

येथील मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवारच्या आठवडाबाजारातून नाशिकच्या शेतकºयांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये घडला आहे.

भार्इंदर : येथील मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवारच्या आठवडाबाजारातून नाशिकच्या शेतकºयांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये घडला आहे. येथील हॉलमध्ये मंडप-डेकोरेशनचे काम घेणाºया भाजपा नगरसेवकाच्या सांगण्यावरून मंडईच्या दारास टाळे ठोकल्याचा आरोप आहे. त्यामुळे मध्यरात्री दीड वाजतापासून भरथंडीत कुडकुडत रस्त्यावर राहावे लागलेल्या शेतकºयांना रविवारी सकाळी आपला बाजारसुद्धा रस्त्यावरच मांडावा लागला.शेतकºयांच्या मालास भाव मिळावा, अडत्यांच्या कात्रीतून सुटका होऊन त्यांना थेट बाजारपेठेत फळे-भाजीपाला विकता यावा, तसेच नागरिकांनासुद्धा याचा फायदा व्हावा, म्हणून राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडाबाजार भरवण्याची योजना अमलात आणली. राज्याच्या कृषी पणन महामंडळानेदेखील त्यासाठी पालिकेला कळवले. तत्कालीन महापौर गीता जैन यांच्या आग्रही मागणीनंतर पालिकेने भार्इंदर पश्चिम येथील अमृतवाणी मार्गावरील मार्केटचे आरक्षण क्र.-९७ आणि इंद्रलोक भागातील मीनाताई ठाकरे मंडई आरक्षण क्रमांक-२३१ मधील जागा शेतकºयांच्या आठवडाबाजारासाठी उपलब्ध करून दिली. तसे पत्र पालिकेने पणन मंडळास दिले.मंडईच्या आवारात १३ महिन्यांपासून दररविवारी शेतकरी आठवडाबाजार भरतो. नाशिकवरून येणारे ३० ते ३५ शेतकरी आपला भाजीपाला आदी येथे विक्रीसाठी टेम्पोने घेऊन येतात. यात काहीमहिला शेतकºयांचासुद्धा समावेश आहे.थेट ग्राहकांना भाजीपाला विकल्याने शेतकºयांना भाव मिळतो. शिवाय, ग्राहकांना थेट शेतातील भाजीपाला माफक दरात मिळत असल्याने हा आठवडाबाजार लोकांच्या पसंतीस उतरला आहे.दरम्यान, ठाकरे मंडईमध्ये पालिकेने खाली मंडई आणि वर हॉल असे बांधकाम केले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी होळीच्यावेळी केले होते. आता पालिकेने हा हॉल गोल्डन पेटल नावाच्या कंत्राटदारास भाड्याने दिला आहे. गोल्डन पेटलचे नाव असले, तरी यामागे भाजपा नगरसेवक राकेश शाह हे असल्याची चर्चा आहे.शाह यांनी मंडईच्या आवारात भरणारा आठवडाबाजार बंद करण्यास शेतकºयांना सांगितल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास नाशिकचे शेतकरी भाजीपाला घेऊन आले असता, मंडईचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. शाह यांनी तुम्हाला आत घ्यायचे नाही, असे सांगितले असून तुमची व्यवस्था तुम्ही करा, असे त्यांना रखवालदारांमार्फत बजावण्यात आले.पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे तक्रार केल्यावर मंडईचे प्रवेशद्वार खुले केले गेले. परंतु, आधीच रस्त्यावर बाजार सुरू केल्याने शेतकरी आत गेले नाही.दरम्यान, शहरातील भाजपा नेत्यांना शेतकरी नको आहेत. त्यांना त्यांचा धंदा व उद्योगपती हवे आहेत. बेकायदा फेरीवाल्यांना आश्रय देतात. आठवडाबाजार बंद केला, तर आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिली.रात्री १ च्या सुमारास नाशिकवरून आलो असता मंडईच्या आत गाडी नेण्यास मनाई केली. यापुढे गाडी आत लावायची नाही. तुमचे तुम्ही बघा, असे सांगण्यात आले. आणलेला भाजीपाला परत कसा न्यायचा? नुकसान होईल, म्हणून नाइलाजाने रस्त्यावरच थांबलो व सकाळी भाजीपाला विक्रीसाठी ठेवला.- राजेश बाळासाहेब आव्हाड, शेतकरीमी ठाकरे हॉल भाड्याने घेतला नसून या प्रकाराशी माझा काहीच संबंध नाही. माझा आधीपासून मंडप- डेकोरेशनचा व्यवसाय असून या हॉलमध्ये ठेकेदाराच्या आॅर्डरवरून माझे केवळ मंडप-डेकोरेशनचे काम चालते.- राकेश शाह, भाजपा नगरसेवकशेतकºयांच्या हक्कासाठी आठवडाबाजारास पालिकेने जागा द्यावी, म्हणून आपण प्रयत्न केले होते. त्यांना हुसकावून लावणे म्हणजे समस्त शेतकºयांचा अपमान आहे. भाजीपाला मंडईमध्ये विकायचा नाही, तर कुठे विकायचा?- गीता जैन, माजी महापौर, भाजपामोदी आणि फडणवीसांच्या राज्यात शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या, पीक विम्यात घोटाळा आदींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच, आता पालिकेतील सत्ताधारी भाजपाने शेतकºयांचे कडाक्याच्या थंडीत अमानवी हाल करून त्यांना मंडईतून हुसकावून लावणे निंदनीय आहे.- शैलेश पांडे, प्रवक्ते, शिवसेना

टॅग्स :bhayandarभाइंदर