शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भार्इंदरच्या मंडईतून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 05:35 IST

येथील मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवारच्या आठवडाबाजारातून नाशिकच्या शेतकºयांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये घडला आहे.

भार्इंदर : येथील मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवारच्या आठवडाबाजारातून नाशिकच्या शेतकºयांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये घडला आहे. येथील हॉलमध्ये मंडप-डेकोरेशनचे काम घेणाºया भाजपा नगरसेवकाच्या सांगण्यावरून मंडईच्या दारास टाळे ठोकल्याचा आरोप आहे. त्यामुळे मध्यरात्री दीड वाजतापासून भरथंडीत कुडकुडत रस्त्यावर राहावे लागलेल्या शेतकºयांना रविवारी सकाळी आपला बाजारसुद्धा रस्त्यावरच मांडावा लागला.शेतकºयांच्या मालास भाव मिळावा, अडत्यांच्या कात्रीतून सुटका होऊन त्यांना थेट बाजारपेठेत फळे-भाजीपाला विकता यावा, तसेच नागरिकांनासुद्धा याचा फायदा व्हावा, म्हणून राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडाबाजार भरवण्याची योजना अमलात आणली. राज्याच्या कृषी पणन महामंडळानेदेखील त्यासाठी पालिकेला कळवले. तत्कालीन महापौर गीता जैन यांच्या आग्रही मागणीनंतर पालिकेने भार्इंदर पश्चिम येथील अमृतवाणी मार्गावरील मार्केटचे आरक्षण क्र.-९७ आणि इंद्रलोक भागातील मीनाताई ठाकरे मंडई आरक्षण क्रमांक-२३१ मधील जागा शेतकºयांच्या आठवडाबाजारासाठी उपलब्ध करून दिली. तसे पत्र पालिकेने पणन मंडळास दिले.मंडईच्या आवारात १३ महिन्यांपासून दररविवारी शेतकरी आठवडाबाजार भरतो. नाशिकवरून येणारे ३० ते ३५ शेतकरी आपला भाजीपाला आदी येथे विक्रीसाठी टेम्पोने घेऊन येतात. यात काहीमहिला शेतकºयांचासुद्धा समावेश आहे.थेट ग्राहकांना भाजीपाला विकल्याने शेतकºयांना भाव मिळतो. शिवाय, ग्राहकांना थेट शेतातील भाजीपाला माफक दरात मिळत असल्याने हा आठवडाबाजार लोकांच्या पसंतीस उतरला आहे.दरम्यान, ठाकरे मंडईमध्ये पालिकेने खाली मंडई आणि वर हॉल असे बांधकाम केले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी होळीच्यावेळी केले होते. आता पालिकेने हा हॉल गोल्डन पेटल नावाच्या कंत्राटदारास भाड्याने दिला आहे. गोल्डन पेटलचे नाव असले, तरी यामागे भाजपा नगरसेवक राकेश शाह हे असल्याची चर्चा आहे.शाह यांनी मंडईच्या आवारात भरणारा आठवडाबाजार बंद करण्यास शेतकºयांना सांगितल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास नाशिकचे शेतकरी भाजीपाला घेऊन आले असता, मंडईचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. शाह यांनी तुम्हाला आत घ्यायचे नाही, असे सांगितले असून तुमची व्यवस्था तुम्ही करा, असे त्यांना रखवालदारांमार्फत बजावण्यात आले.पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे तक्रार केल्यावर मंडईचे प्रवेशद्वार खुले केले गेले. परंतु, आधीच रस्त्यावर बाजार सुरू केल्याने शेतकरी आत गेले नाही.दरम्यान, शहरातील भाजपा नेत्यांना शेतकरी नको आहेत. त्यांना त्यांचा धंदा व उद्योगपती हवे आहेत. बेकायदा फेरीवाल्यांना आश्रय देतात. आठवडाबाजार बंद केला, तर आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिली.रात्री १ च्या सुमारास नाशिकवरून आलो असता मंडईच्या आत गाडी नेण्यास मनाई केली. यापुढे गाडी आत लावायची नाही. तुमचे तुम्ही बघा, असे सांगण्यात आले. आणलेला भाजीपाला परत कसा न्यायचा? नुकसान होईल, म्हणून नाइलाजाने रस्त्यावरच थांबलो व सकाळी भाजीपाला विक्रीसाठी ठेवला.- राजेश बाळासाहेब आव्हाड, शेतकरीमी ठाकरे हॉल भाड्याने घेतला नसून या प्रकाराशी माझा काहीच संबंध नाही. माझा आधीपासून मंडप- डेकोरेशनचा व्यवसाय असून या हॉलमध्ये ठेकेदाराच्या आॅर्डरवरून माझे केवळ मंडप-डेकोरेशनचे काम चालते.- राकेश शाह, भाजपा नगरसेवकशेतकºयांच्या हक्कासाठी आठवडाबाजारास पालिकेने जागा द्यावी, म्हणून आपण प्रयत्न केले होते. त्यांना हुसकावून लावणे म्हणजे समस्त शेतकºयांचा अपमान आहे. भाजीपाला मंडईमध्ये विकायचा नाही, तर कुठे विकायचा?- गीता जैन, माजी महापौर, भाजपामोदी आणि फडणवीसांच्या राज्यात शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या, पीक विम्यात घोटाळा आदींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच, आता पालिकेतील सत्ताधारी भाजपाने शेतकºयांचे कडाक्याच्या थंडीत अमानवी हाल करून त्यांना मंडईतून हुसकावून लावणे निंदनीय आहे.- शैलेश पांडे, प्रवक्ते, शिवसेना

टॅग्स :bhayandarभाइंदर