शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, ठाणे होणार 'इलेक्ट्रॉनिक्स हब'

By admin | Updated: June 18, 2014 13:56 IST

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याची योजना आखली असून, यात राज्यातील औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे या चार शहरांची निवड केली आहे.

 
गाझियाबादसह गुजरातेतील तीन शहरांचा समावेश; कंपन्यांना मिळणार अनुदान
 
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानासोबतच भारताची ओळख 'इलेक्ट्रॉनिक्स हब' निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याची योजना आखली असून, याकरिता औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे या महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांसह देशातील अन्य चार शहरांची निवड केली आहे. 
केंद्रीय दूरसंचारमंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांसह गाझियाबाद, बडोदे, अहमदाबाद व गांधीनगर या शहरांची निवड याकरिता करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सात पर्यावरण स्नेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टरच्या उभारणीवर सरकार भर देणार आहे. लहान-मोठय़ा इलेक्ट्रॉनिक वस्तूंकरिता लागणार्‍या सर्व सुट्या भागांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादनाच्या खर्चात कपात होतानाच सुमारे दोन कोटी ८0 लाख लोकांना नव्याने रोजगार मिळेल, असे म्हणाले. या शहरांतून या क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा, याकरिता सरकारने त्यांना करमाफी व अनुदान रूपाने प्रोत्साहन देण्यात येईल.सरकारच्या या योजनेअंगर्तत या शहरांतून नव्याने प्रकल्प सुरू करणार्‍या कंपन्यांना भांडवली खर्चाचा परतावा देण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)