शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST

ठाणे : विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय ...

ठाणे : विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केला. नियोजित नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जावे, ही भूमिपुत्रांचीच इच्छा आणि मागणी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

ठाणे जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा प्रारंभ ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर ठाणे शहरातील इंदिरानगर, वागळे इस्टेट, नितीन कंपनी, पाचपाखाडी मार्गे ही यात्रा मासुंदा तलाव येथे आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे आपले मनोगत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, मोदी हे जनताभिमुख कारभार करीत आहेत. त्यांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या भाषणाला देशातील तरुणाईने चांगले रँकिंग दिले आहे. देशाची युवा पिढी आणि जनता मोदींचे नेतृत्व मान्य करते. राजकारणाची दिशा वेगळी करण्यासाठी देशातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. कितीही पक्ष एकत्र आले तरी २०२४ मध्ये मोदी हेच पंतप्रधान होतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

* दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जावे, ही मागणी जरी आपण लोकसभेत २०१५ मध्ये केली असली तरी ती केवळ आपली वैयक्तिक मागणी नसून ती भूमिपूत्रांची मागणी आहे. मात्र राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून प्रस्ताव पारीत करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची भूमिका घेतली. नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनीही भूमिपुत्रांच्या दिबांच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

* ठाण्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानेच आभार

जनतेमुळे खासदार आणि मोदींमुळे मंत्री झालो. प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवरून लोकांची कामे करण्यासाठी व जनआशीर्वाद घेण्याकरिता निघालो आहे. यात निवडणुकांचा काहीही संबंध नाही. ७४ वर्षांनी ठाण्याला मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाल्यानेच आभार प्रदर्शनासाठी ही यात्रा असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

* या वेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि अ‍ॅड. संदीप लेले यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

.......

वाचली