शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्थायी समिती सभापतीपदासाठी चुरस, आता भाजपाची टर्म, मनोज राय आणि राहुल दामले यांची नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:07 IST

कल्याण-डोेंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कालावधी संपल्याने त्यांच्या जागी सोमवारी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली.

कल्याण : कल्याण-डोेंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कालावधी संपल्याने त्यांच्या जागी सोमवारी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी महासभेत त्यांच्या निवडीची घोषणा केली. दरम्यान, समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस आहे.शिवसेनेचे सदस्य जयवंत भोईर, शालिनी वायले, दीपेश म्हात्रे, निलेश शिंदे, भाजपा सदस्य मनोज राय, नितीन पाटील, संदीप पुराणिक, मनसे सदस्या तृप्ती भोईर या आठ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्यपदासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांची नावे सुचवली होती.स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जयवंत भोईर इच्छुक आहेत. भोईर यांनी आतापर्यंत पक्षाकडे कोणतेही पद मागितलेले नव्हते. त्यामुळे त्यांचा पक्षाकडून विचार होऊ शकतो. महापालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या स्थायी समिती सभापतीची संधी भाजपाचे संदीप गायकर यांना देण्यात आली होती. त्यानंतर, शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना सभापतीपद मिळाले. ते विद्यमान सभापती आहेत. आता पुन्हा भाजपाची टर्म असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाकडून नव्याने निवड झालेले मनोज राय व राहुल दामले या दोन सदस्यांची नावे चर्चेत आहेत.मात्र, असे असले तरी पुराणिक हे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने राज्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला, तर त्यांचाही नंबर लागू शकतो. शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे हे पुन्हा सभापतीच्या स्पर्धेत उतरू शकतात. त्याचबरोबर शालिनी वायले व निलेश शिंदे हे देखील आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत. पक्षाकडून वायले व शिंदे यांचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.>अपक्षांचा केवळ सत्तेसाठी वापर; स्थायी समितीत डावलल्याने व्यक्त केली नाराजीकल्याण : केडीएमसीत सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपाला अपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, सोमवारी झालेल्या स्थायी समिती सदस्य निवडीत त्यांना डावलण्यात आले. केवळ सत्तेसाठी आमचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप पाठिंबा देणाºया अपक्ष सदस्यांकडून केला जात आहे. स्थायी समितीत सोमवारी शिवसेनेकडून जयवंत भोईर, शालिनी वायले, दीपेश म्हात्रे आणि निलेश शिंदे यांची निवड झाली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पत्राचे वाचन करताना सांगितले. भोईर यांना काहीच पद दिले गेले नव्हते. त्यामुळे त्यांची निवड रास्त आहे. मात्र, म्हात्रे यांना पुन्हा पक्षाने संधी दिली आहे. ते स्थायीचे सभापती व सदस्यही होते. तर, वायले व शिंदे यांनाही प्रथमच पद दिले आहे. शिंदे हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले. तेव्हा त्यांना कोणतेही पद दिलेले नव्हते.या पार्श्वभूमीवर अपक्ष नगरसेवक कासीब तानकी यांनी त्यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सलग दोन वर्षे स्थायीचे सदस्यपद दिले जाईल, असे महापौर, सभागृह नेते व गटनेते यांनी त्यांना कबूल केले होते. एक वर्षासाठीच त्यांना सदस्यपद दिले गेले. मात्र, या वेळी त्यांचा विचार न करता त्यांना डावलण्यात आले. तानकी यांच्या मते अन्य अपक्ष सदस्यांचीही नाराजी सत्तेच्या विरोधात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका