शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विकासकामांच्या नावाने बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने नवे आयुक्त पी. वेलारासू यांनी ताकही फुंकर मारून पिण्याचा पवित्रा घेतला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने नवे आयुक्त पी. वेलारासू यांनी ताकही फुंकर मारून पिण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ते विकासकामांच्या फाइल्सवर सह्या करत नसल्याने या फाइल्स पडून असल्याची ओरड नगरसेवकांकडून होत आहे.२०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात महापालिकेची निवडणूक झाली. रवींद्रन यांनी रस्त्यांची विकासकामे व स्मार्ट सिटीसाठी रेल्वेस्थानक परिसर मोकळा करण्यासाठी अतिक्रमण हटवण्याचा धडाका लावला. मात्र, राजकीय दबावामुळे त्यांची धडक मोहीम थंडावली. निवडणुकीनंतर पहिले वर्ष आर्थिकदृष्ट्या थंड होते. एलबीटी बंद झाली. तसेच त्यापोटी मिळणारे अनुदान दोन महिने मिळाले नाही. महापालिकेत आलेल्या २७ गावांसाठीचे विकास पॅकेज दीड वर्ष उलटूनही सरकारने दिलेले नाही. दुसरीकडे ठाणे, उल्हासनगर, भिवंडी पालिका तसेच विधान परिषद सदस्य व शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागली. काही वेळेस आचारसंहिता व निवडणुकीच्या कामासाठी रवींद्रन पंजाबला गेले. त्यानंतर, रवींद्रन मसुरीला प्रशिक्षणाला गेले. तेथून ते परतताच त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी वेलारासू यांची बदली झाली. वेलारासू आल्याने विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा होती. जिल्हाधिकारीपदाचा त्यांना मोठा अनुभव आहे. मात्र, पालिकेतील काही अधिकारी त्यांची दिशाभूल करत आहेत. यापूर्वीच्या आयुक्तांबाबतही हाच प्रकार झाला होता. विकासकामांत त्यांनी खोडा घातला. महापालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने वेलारासू यांनी ‘ताकही फुंकर मारून प्यावे’ हा पवित्रा घेतला जात आहे. महिलांनी त्यांची विकासकामे होत नाहीत. त्यासाठी गोल्डन गँग आड येते. त्यांच्याकडून खोडा घातला जातो, असा आरोप राज्य सरकारच्या महिला हक्क व कल्याण समितीकडे केला. त्यामुळे समितीने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आयुक्त विकासकामांच्या फाइल्सवर सह्या करत नाहीत. त्यामुळे पुन्हा विकासकामे अडकून पडली आहेत. आर्थिक शिस्तीवर भर- आयुक्तांनी खर्चाला कात्री लावली आहे. महत्त्वाची कामेच तातडीने केली जाणार आहेत. - उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी दोन दिवसांपूर्वीच महापौर व पदाधिकाऱ्यांसोबत करवसुलीसंदर्भात आयुक्तांनी बैठक घेतली. त्यात शास्ती, मोकळ्या जागेवरील कर आणि भाडेकरूंना लावण्यात येणारा मालमत्ताकर याविषयी विचारविनिमय केला आहे. - अनेक कंत्राटदारांची बिले थकली आहेत. त्याचबरोबर तरतूद नसताना जास्तीची विकासकामे घेतलेली आहेत. १०० कोटींपेक्षा जास्त स्पील ओव्हर बजेटमध्ये आहे.