शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

उल्हासनगर महापालिकेवरच नेला जनाजा, कबरस्थानच्या जागेचा प्रश्न पुन्हा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:46 IST

उल्हासनगर : दफनभूमीसाठी जागा मंजूर झाल्यानंतरही तेथे कबरस्थान होत नसल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने गुरूवारी महापालिकेच्या प्रवेशद्बारावर जनाजा आणत ठिय्या आंदोलन केले. याप्रकाराने एकच खळबळ उडाली अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासमवेत मुस्लिम नागरिकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला. याप्रश्नी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.उल्हासनगरच्या ...

उल्हासनगर : दफनभूमीसाठी जागा मंजूर झाल्यानंतरही तेथे कबरस्थान होत नसल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने गुरूवारी महापालिकेच्या प्रवेशद्बारावर जनाजा आणत ठिय्या आंदोलन केले. याप्रकाराने एकच खळबळ उडाली अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासमवेत मुस्लिम नागरिकांच्या प्रतिनिधींनी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला. याप्रश्नी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.उल्हासनगरच्या कॅम्प एक परिसरातील साबिरा खान यांचा गुरूवारी मृत्यू झाला. शहरात कब्रस्थानला मंजुरी आहे. पण ते प्रत्यक्षात न आल्याने दफनविधीला परवानगी नाही. त्यामुळे मृतदेह घेऊन कल्याण किंवा अंबरनाथला दफनविधीसाठी जावे लागते. त्यामुळे संतापलेल्या मुस्लिम समाजाने जनाजा थेट पालिकेच्या प्रवेशद्बारावर आणत ठिय्या आंदोलन सुरू केले. या प्रकाराने महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले. काही नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर मुस्लिमांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांसोबत चर्चा केली आणि तातडीने कब्रस्थानसाठी जागा देण्याची मागणी केली. तेव्हा नवीन शहर विकास आराखड्यासंदर्भात ६ फेबु्रवारीला राज्यमंत्र्याकडे बैठक असल्याचे सांगून आयुक्तांनी त्यांना तेथे चर्चेचे निमंत्रण दिले. जोवर नव्या विकास आराखडयाला सरकारची मंजुरी मिळत नाही, तोवर कब्रस्थानलाही जागा मिळणार नसल्याचे आयुक्तांनी लक्षात आणून दिले.दफनभूमीसाठी समाजाचा ३० वर्षांचा लढाशहरात मुस्लिमांची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. मात्र कब्रस्थान नसल्याने दफनविधीसाठी त्यांना कल्याण किंवा अंबरनाथला जावे लागते. गेल्या २५ ते ३० वर्षापासून मुस्लिमांनी कब्रस्थानची मागणी लावून धरली. दोन वर्षापूर्वी म्हारळ गावाशेजारील दोन एकरांचा भूखंड तसेच कॅम्प नं-५ येथील स्मशानभूमीजवळील जागा कब्रस्थानसाठी देण्यात आली.म्हारळचा भूखंड रिजन्सी कंपनीने पालिकेला हस्तातरित केल्यावर कब्रस्थानची जागा मुस्लिम संघटनेकडे देण्याची तयारी सुरू होती. त्याचदरम्यान अन्सारी नावाच्या तरूणाचा मुत्यू झाला. अंबरनाथ आणि कल्याण येथील कब्रस्थान समितीने त्या तरूणाचे दफन आपल्या परिसरात करण्यास नकार दिला.तेव्हा संतप्त मुस्लिमांनी त्याचा जनाजा महापालिकेसमोर आणून ठेवला. दफनविधी करण्यास परवानगी दिली नाही, तर त्याला महापालिकेसमोर दफन करण्याचा इशारा दिला होता. तसाच प्रकार गुरूवारी घडला.अंत्यसंस्काराच्या जागेचा तिढा कायमचशहर विकास आराखड्यापूर्वी म्हारळच्या नियोजित कब्रस्थानाच्या जागेत पोलीस संरक्षणात अन्सारी यांच्यासह दोघांचे दफनविधी झाले. त्यानंतर हा प्रश्न न्यायालयात गेला. तेव्हा पालिकेने तेथे दफन करण्यास परवानगी नाकारली.कॅम्प नं-५ येथील हिंदू स्मशानभूमीजवळीत कब्रस्थानचा प्रश्नही असाच लटकला आहे. नव्या शहरविकास आराखड्यात सम्राट अशोकनगर येथील शाळा, रहिवासी विभाग व कॅम्प नं-५ येथे हिंदू स्मशानभूमी व कब्रस्थानची नियोजित जागा आहे. नव्या आराखड्यात म्हारळ गाव व शहाड येथील एका कंपनीच्या जागेत कब्रस्थान दर्शवण्यात आले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका